शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:17 IST

गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम अचानक बंद करण्यात आले असून, येथील मशनरी साहित्यासह कामगारांनी परतीचा मार्ग पकडला आहे. त्यामुळे पुलाचे काम बंद असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तूर्तास या पुलाचे काम अर्ध्यावरच लटकण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवर बहादूरशेख येथे नवीन पुलाचे बांधकाम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे दोन पूल असून, एका पुलाचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. येथील जुना पूल जीर्ण व धोकादायक बनल्याने सर्व वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला होता. एक पूल पूर्ण झाल्याने बाजूलाच असलेल्या दुसऱ्या पुलाचे काम वेगात पूर्ण होईल व हा पूलही दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊन दुहेरी वाहतूक सुरू केली जाईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. परंतु, आता मात्र या पुलाचे भवितव्य अधांतरी लटकतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे. इतकेच नव्हे, तर येथील सर्व साहित्य व मोठमोठ्या मशनरीही हलवण्यात येत आहेत. कामगारांनीही गाशा गुंडाळल्याने काम बंद पडले आहे. याबाबत कंपनी व कामगार कोणतीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. याविषयी माजी सभापती शौकत मुकादम यांनी दखल घेत कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.

पुलाचे काम अचानक बंद का झाले व पुन्हा कधी सुरू करणार? याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. सर्व माहिती त्यांनी द्यावी. अन्यथा, मग आमच्या भाषेत बोलावे लागेल. काम अर्धवट बंद पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. वाहतुकीला अडथळे हाेणार असून, अपघाताची संख्या वाढणार आहे. तेव्हा या विभागाने माहिती न लपवता खरं काय ते सांगावे. - शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी