शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 17:17 IST

गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम अचानक बंद करण्यात आले असून, येथील मशनरी साहित्यासह कामगारांनी परतीचा मार्ग पकडला आहे. त्यामुळे पुलाचे काम बंद असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. तूर्तास या पुलाचे काम अर्ध्यावरच लटकण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवर बहादूरशेख येथे नवीन पुलाचे बांधकाम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. प्रत्यक्षात हे दोन पूल असून, एका पुलाचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. येथील जुना पूल जीर्ण व धोकादायक बनल्याने सर्व वाहतूक नवीन पुलावरून सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला होता. एक पूल पूर्ण झाल्याने बाजूलाच असलेल्या दुसऱ्या पुलाचे काम वेगात पूर्ण होईल व हा पूलही दिवाळीनंतर किंवा डिसेंबरअखेरीस वाहतुकीसाठी खुला होऊन दुहेरी वाहतूक सुरू केली जाईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. परंतु, आता मात्र या पुलाचे भवितव्य अधांतरी लटकतेय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून कामाची गती मंदावली होती. परंतु, आता मात्र काम पूर्णपणे बंद पडले आहे. इतकेच नव्हे, तर येथील सर्व साहित्य व मोठमोठ्या मशनरीही हलवण्यात येत आहेत. कामगारांनीही गाशा गुंडाळल्याने काम बंद पडले आहे. याबाबत कंपनी व कामगार कोणतीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. याविषयी माजी सभापती शौकत मुकादम यांनी दखल घेत कामाच्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु येथे कोणतीच माहिती त्यांना मिळाली नाही.

पुलाचे काम अचानक बंद का झाले व पुन्हा कधी सुरू करणार? याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. सर्व माहिती त्यांनी द्यावी. अन्यथा, मग आमच्या भाषेत बोलावे लागेल. काम अर्धवट बंद पडल्याने अडचण निर्माण झाली आहे. वाहतुकीला अडथळे हाेणार असून, अपघाताची संख्या वाढणार आहे. तेव्हा या विभागाने माहिती न लपवता खरं काय ते सांगावे. - शौकत मुकादम, माजी सभापती, पंचायत समिती चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी