शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले

By admin | Updated: October 2, 2014 00:28 IST

महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

रत्नागिरी : महावितरणच्या ३३/११ केव्ही रहाटाघर उपकेंद्राचे काम पावसामुळे रखडले आहे. उपकेंद्र परिसरात पाणी साठल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. भूमिगत वाहिनीचे कामकाज पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सुरू होण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रहाटाघर उपकेंद्र सुमारे पाच कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत आहे. या उपकेंद्राची क्षमता १० मेगावॅट आहे. या ठिकाणी ५ मेगावॅटचे दोन ट्रान्स्फार्मर उभारण्यात येणार आहेत. ३३/११ केव्ही हार्बर उपकेंद्र व ३३/११ केव्ही कुवारबाव केंद्रांना हे उपकेंद्र जोडण्यात येणार आहे. शिवाय ३३/११ केव्ही पावस येथून येणारी भूमिगत वाहिनी या उपकेंद्राला जोडली जाणार आहे. कुवारबाव किंवा हार्बर वाहिनी बंद पडल्यास पावस वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे. या उपकेंद्रामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. भूमिगत वीज वाहिनी शहरात आणण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणने ३५ लाख रूपये नगरपालिकेकडे जमा केले आहेत. कोस्टल विभागातील भूमिगत वीजवाहिनीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहर, गणपतीपुळे, गुहागर व मालवण येथे भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. फयान किंवा अन्य वादळ झाल्यास ओव्हरहेड वायर तुटण्याची भीती असते. पावसाळ्यात भूमिगत वाहिन्यांचे काम करता येत नाही. त्यामुळे संबंधित काम थांबविण्यात आले होते. डिसेंबरपर्यंत उपकेंद्र होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता एस. पी. नागटिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)