शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सामंतांच्या कार्यालयावर प्रेरक धडकणार

By admin | Updated: July 1, 2014 00:13 IST

जाब विचारणार : रत्नागिरीत गुरुवारी करणार तीव्र आंदोलन

मार्लेश्वर : पाच जिल्ह्यात शिक्षण समृद्धी योजना प्रायोगिक तत्वावर राबवण्याचा निर्णय होवून ही योजनेच्या अमलबजावणीसाठीची प्रक्रिया पुढे सरकत नाही. याबाबत पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २ हजार प्रेरक पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील कार्यालयावर दि. ७ रोजी तीव्र आंदोलन छेडणार आहेत.शासनाने निरंतर शिक्षण केंद्र योजना अचानक बंद केल्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील सुमारे ७ हजार प्रेरकांवर उपासमारीची वेळ आली आहे.यानंतर या पाच जिल्ह्यातील प्रेरकांनी शासनाविरोधात वारंवार आंदोलने केली. या आंदोलनामुळे या पाच जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय तत्वत: मान्य करण्यात आला. तसेच योजनेची अमलबजावणी तातडीने करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतर हे आश्वासन पाळण्यात आलेले नाही, असे या प्रेरकांचे म्हणणे आहे.याच काळात शिक्षण हक्काचा कायदा अस्तित्वात आला. यावेळी शिक्षण समृद्धी योजनेचा प्रस्ताव शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार द्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण समृद्धी प्रेरक संघटनेला दिल्या. यानुसार संघटनेने योजनेचा फेरप्रस्ताव शिक्षण मंत्रालयाला सादर केला. यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या संचालिका व्ही. राधा यांच्यासोबत या प्रस्तावावर चर्चाही झाली. या प्रस्तावावर निर्णायक बैठक घेवून त्याला अंतिम मान्यतेसाठी कॅबिनेटसमोर ठेवले जाईल, असेही ठरले.मात्र अद्यापही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही व योजनेची अंमलबजावणीसुद्धा झालेली नाही. त्यामुळे गेले चार वर्ष सातत्याने संघर्ष करणाऱ्या प्रेरकांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.आता सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यानुसार संघटनेचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील शिक्षण प्रेरक मोठ्या संख्येने मोर्चा काढणार आहेत.हा मोर्चा मारुती मंदिर ते जयस्तंभ असा निघणार आहे. सकाळी १०.३० वा. या मोर्चाला मारुती मंदिरपासून सुरुवात होणार आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय लिंगायत, श्रमिक मुक्ती दलाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र धावणे, उपाध्यक्ष उमेश कोलगे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)