शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

केंद्राचे काम आधुनिक गरजानुरूप असावे

By admin | Updated: December 3, 2015 23:51 IST

‘आम्ही चिपळूणकर’ची मागणी : लवकरच नगराध्यक्षांना भेटणार

चिपळूण : चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ रखडलेले नूतनीकरणाचे काम गेल्या आठवड्यात पुन्हा सुरु झाले आहे. हे बांधकाम निर्धारित कालावधीत पूर्ण व्हावे तसेच ते आधुनिक गरजांचा काटेकोर तसेच काळजीपूर्वक विचार करून केले जावे, अशी मागणी ‘आम्ही चिपळूणकर’कडून करण्यात येत आहे. तसे निवेदन या लोकचळवळीतर्फे नगरपरिषदेला लवकरच सादर करण्यात येणार आहे.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सध्या पूर्ववत सुरु झालेल्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आर्किटेक्ट प्रशांत वराडकर चिपळूणमध्ये आले होते. यावेळी आम्ही चिपळूणकरच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन त्यांच्याशी केंद्राच्या नूतनीकरण आराखाड्याविषयी सुमारे दीड तास तपशीलवार चर्चा केली. प्रशांत वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा आराखडादेखील त्यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली साकारलेला आहे.या पार्श्वभूमीवर आम्ही चिपळूणकरच्या प्रतिनिधींनी प्रशांत वराडकर यांच्याकडून या केंद्राच्या नूतनीकरणाचा आराखडा तपशीलवार समजून घेतला. सध्या या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळालेली असून, दुसऱ्या टप्प्याच्या आराखड्याचे सादरीकरणही झालेले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात मुख्यत: अंतर्गत सजावटीच्या कामाचा अंतर्भाव आहे. हे केंद्र सध्याच्या व भविष्यातील गरजांचा साकल्याने विचार करून उभारले जावे, या भूमिकेतून प्रकाश योजना, ध्वनी योजना, बैठक व्यवस्था, वातानुकूलन व्यवस्था अशा अनेक तांत्रिक बाबींचा यात विचार केलेला आहे. या चर्चेच्या दरम्यान चिपळूण नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील यांचे सांस्कृतिक केंद्रात आगमन झाले. यावेळी त्यांच्याशीदेखील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावित सुधारणांबाबत चिपळूण नगरपरिषदेने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावेत, असे आवाहन आम्ही चिपळूणकरतर्फे नगरपरिषदेला करण्यात येणार आहे. या चर्चेत रमाकांत सकपाळ, राजन इंदुलकर, निशिकांत पोतदार, ऋजुता खरे, प्रताप गजमल, ओंकार भोजने, कुमारगौरव वायदंडे, सचिन कांबळे, रुपेश धाडवे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)हजारो माणसे सुमारे तीन तास एका हॉलमध्ये बसणार आहेत. त्यामुळे आतील हवा उत्तम राहणे, रसिकांना निवांतपणे आस्वाद घेता यावा, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवाय चिपळूणमधील विविध ऋतूतील वातावरणाचा विचार करता हे नाट्यगृह वातानुकुलीत असणे ही काळाची गरज आहे. आजकाल नव्याने बांधण्यात येणारी सर्व नाट्यगृह, सिनेमा गृह वातानुकुलीतच असतात. सुमारे १२०० खुर्च्यांचे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह हे वातानुकुलीतच असावे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.