शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

सेना-भाजपच्या भांडणात कामांना ब्रेक

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

रत्नागिरी पालिकेतील सत्ता संघर्ष तीव्र होणार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेत सेना-भाजपने युतीने निवडणूक लढवून अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यातील सेना-भाजप युती तुटल्यानंतर रत्नागिरी पालिकेतही तीच स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षात सातत्याने संघर्ष निर्माण होत असून, शहरातील अनेक विकासकामांची कोंडी झाली आहे. दोघांच्या भांडणात विकासाचे तीनतेरा वाजले असून, नागरिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रत्येकी सव्वा वर्षासाठी दोनवेळा नगराध्यक्षपद घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला होता. मात्र, युती तुटल्यानंतर पालिकेतील भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पद सोडण्यास नकार दिल्यानंतर सेना - भाजपात वादावादी सुरू झाली. एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. पालिकेच्या सभेत भाजप नगराध्यक्ष मयेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेला महत्त्व न देता कारभार करण्याचा प्रयत्न भाजपानेही केला. त्यातूनच संघर्ष वाढला असून, गेल्याच आठवड्यात झालेल्या विशेष सभेत अनेक विषयांवर मंजुरी देताना शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शहरातील एलइडी प्रकल्प राबविण्यासाठी नगराध्यक्ष मयेकर यांनी संबंधित कंपन्यांकडून थिबा रोडवर एलइडी पथदीपांचा पायलट प्रोजेक्टही राबवून घेतला. त्यावेळी सेना-भाजपा एकत्र होते. आता युती तुटली असून, भाजपाने शब्द पाळला नाही, याचा राग सेनेला आहे. त्यामुळे एलइडी प्रोजेक्टसाठी निविदा मागवा नाहीतर हा प्रस्ताव तहकुब ठेवा अशी मागणी करीत हा विषय रोखला आहे. त्यामुळे कोंडी करण्याचे सत्र यापुढेही सेनेकडून होणार आहे. (प्रतिनिधी)सेनेच्या या भूमिकेमुळे भाजपानेही शह-काटशहाचे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केलेल्या चार नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपानेच पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे शह-काटशहचे राजकारण यापुढेही रंगणार आहे. त्यातच दोन्ही पक्षांची शक्ती खर्च होणार आहे.