शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सेना-भाजपच्या भांडणात कामांना ब्रेक

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

रत्नागिरी पालिकेतील सत्ता संघर्ष तीव्र होणार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेत सेना-भाजपने युतीने निवडणूक लढवून अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यातील सेना-भाजप युती तुटल्यानंतर रत्नागिरी पालिकेतही तीच स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. उपनगराध्यक्ष निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे या दोन्ही पक्षात सातत्याने संघर्ष निर्माण होत असून, शहरातील अनेक विकासकामांची कोंडी झाली आहे. दोघांच्या भांडणात विकासाचे तीनतेरा वाजले असून, नागरिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी पालिकेत युतीची सत्ता आल्यानंतर प्रत्येकी सव्वा वर्षासाठी दोनवेळा नगराध्यक्षपद घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला होता. मात्र, युती तुटल्यानंतर पालिकेतील भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पद सोडण्यास नकार दिल्यानंतर सेना - भाजपात वादावादी सुरू झाली. एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. पालिकेच्या सभेत भाजप नगराध्यक्ष मयेकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेला महत्त्व न देता कारभार करण्याचा प्रयत्न भाजपानेही केला. त्यातूनच संघर्ष वाढला असून, गेल्याच आठवड्यात झालेल्या विशेष सभेत अनेक विषयांवर मंजुरी देताना शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. शहरातील एलइडी प्रकल्प राबविण्यासाठी नगराध्यक्ष मयेकर यांनी संबंधित कंपन्यांकडून थिबा रोडवर एलइडी पथदीपांचा पायलट प्रोजेक्टही राबवून घेतला. त्यावेळी सेना-भाजपा एकत्र होते. आता युती तुटली असून, भाजपाने शब्द पाळला नाही, याचा राग सेनेला आहे. त्यामुळे एलइडी प्रोजेक्टसाठी निविदा मागवा नाहीतर हा प्रस्ताव तहकुब ठेवा अशी मागणी करीत हा विषय रोखला आहे. त्यामुळे कोंडी करण्याचे सत्र यापुढेही सेनेकडून होणार आहे. (प्रतिनिधी)सेनेच्या या भूमिकेमुळे भाजपानेही शह-काटशहाचे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवत राष्ट्रवादीतून फुटून वेगळा गट केलेल्या चार नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी भाजपानेच पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे शह-काटशहचे राजकारण यापुढेही रंगणार आहे. त्यातच दोन्ही पक्षांची शक्ती खर्च होणार आहे.