शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: 'माहेर'मुळे 'ती'ला मिळालं हक्काचं घर अन् माणसं 

By शोभना कांबळे | Updated: March 15, 2023 16:59 IST

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक संबंधित महिला निराधार, मळकट कपड्यात आढळून आली होती

रत्नागिरी : भटकत असलेल्या महिलेला येथील माहेर संस्थेच्या प्रयत्नामुळे मानसिक आजारावर उपचार मिळाले. ती बरी झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर तिला हक्काचे घर व माणसे मिळाली. तिच्या पतीने संस्थेत येऊन या महिलेला आपल्या घरी नेले.रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित मुले- मुली महिला, पुरुष दाखल होत असतात. रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या, मानसिक विकार असलेल्या महिला संस्थेत दाखल होऊन औषध उपचाराने बरे होतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे पुण्यावरून येत असताना पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक एक निराधार, मळकट कपड्यातील महिला दिसली. त्यांनी तिची विचारपूस करून औषध उपचार व निवाऱ्याची गरज ओळखून माहेर संस्थेच्या गाडीतून संस्थेत दाखल केली. तिचे पुढील उपचार ओपीडी बेसवर रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आले. पाच महिन्यात ही महिला बरीही झाली व तिने आपले नाव येसाबाई दगडू एकशिंगे (भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर) असे सांगितले. या पत्त्यावर चौकशी केली असता येसाबाई एकशिंगे यांचे पती यांनी येसाबाई ही आपली पत्नी असल्याचे सांगितले.गेली पाच सहा महिने ती घरातून बाहेर पडली आहे. तसेच ती मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने गाव सोडून बाहेर जाते  परंतु पुन्हा ती घरी येते. परंतु यावेळी खूप दिवस झाले ती घरी आलीच नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आम्ही तिचा खूप शोध घेत होतो. परंतु ती सापडली नाही, असे सांगितले. येसाबाईलाही घरी जाण्याची ओढ लागली होती. त्यांचे पतीने माहेर संस्था हातखंबा येथे येऊन येसाबाई शिंदे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले. माहेर संस्थेमुळे एका निराधार भटकणाऱ्या महिलेला आपले घर मिळाल्याने खूप समाधान वाटले असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी