शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Ratnagiri news: 'माहेर'मुळे 'ती'ला मिळालं हक्काचं घर अन् माणसं 

By शोभना कांबळे | Updated: March 15, 2023 16:59 IST

पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक संबंधित महिला निराधार, मळकट कपड्यात आढळून आली होती

रत्नागिरी : भटकत असलेल्या महिलेला येथील माहेर संस्थेच्या प्रयत्नामुळे मानसिक आजारावर उपचार मिळाले. ती बरी झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर तिला हक्काचे घर व माणसे मिळाली. तिच्या पतीने संस्थेत येऊन या महिलेला आपल्या घरी नेले.रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित मुले- मुली महिला, पुरुष दाखल होत असतात. रस्त्यावर फिरणाऱ्या, नातेवाईक नसणाऱ्या, मानसिक विकार असलेल्या महिला संस्थेत दाखल होऊन औषध उपचाराने बरे होतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे पुण्यावरून येत असताना पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारानजीक एक निराधार, मळकट कपड्यातील महिला दिसली. त्यांनी तिची विचारपूस करून औषध उपचार व निवाऱ्याची गरज ओळखून माहेर संस्थेच्या गाडीतून संस्थेत दाखल केली. तिचे पुढील उपचार ओपीडी बेसवर रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आले. पाच महिन्यात ही महिला बरीही झाली व तिने आपले नाव येसाबाई दगडू एकशिंगे (भुयेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर) असे सांगितले. या पत्त्यावर चौकशी केली असता येसाबाई एकशिंगे यांचे पती यांनी येसाबाई ही आपली पत्नी असल्याचे सांगितले.गेली पाच सहा महिने ती घरातून बाहेर पडली आहे. तसेच ती मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने गाव सोडून बाहेर जाते  परंतु पुन्हा ती घरी येते. परंतु यावेळी खूप दिवस झाले ती घरी आलीच नाही म्हणून आम्ही खूप चिंतेत होतो. आम्ही तिचा खूप शोध घेत होतो. परंतु ती सापडली नाही, असे सांगितले. येसाबाईलाही घरी जाण्याची ओढ लागली होती. त्यांचे पतीने माहेर संस्था हातखंबा येथे येऊन येसाबाई शिंदे यांना सुखरूप आपल्या ताब्यात घेतले. माहेर संस्थेमुळे एका निराधार भटकणाऱ्या महिलेला आपले घर मिळाल्याने खूप समाधान वाटले असे माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी