शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

घराच्या आड्यावर दोन रात्र जागवल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचनाका येथील रहिवासी व आतापर्यंतच्या सर्वच महापुरांचे साक्षीदार असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे

चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचनाका येथील रहिवासी व आतापर्यंतच्या सर्वच महापुरांचे साक्षीदार असलेल्या चितळे कुटुंबानी चक्क दोन दिवस घराच्या आड्यावर बसून काढले. तेथेही महापुराचे पाणी पोहोचल्याने ‘आम्ही जवळून पाहिला मृत्यू’, असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव सांगितल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल.

चिपळूण शहराची भौगोलिक रचना एका बशीच्या आकारासारखी आहे. चारही बाजूंनी उंच तर मध्यभागी खोलगट भाग आहे. त्या बशीचे केंद्र म्हणजे चिंचनाका आहे. या चिंचनाक्यात सर्वात पहिले पुराचे पाणी येते. एकदा चिंचनाक्यात पाणी आले, की शहरात पाणी शिरल्याचे शिक्कामोर्तब होते. त्यानंतर प्रशासन व नागरिक पुराचा अंदाज घेऊन उपाययोजना करतात. त्यामुळे पाऊस वाढल्यानंतर सर्वात प्रथम चिंचनाक्यात पाणी भरले आहे का, अशी चौकशी केली जाते. याच चिंचनाक्यात वर्षानुवर्षे राहात असलेल्या चितळे कुटुंबीयांकडे याबाबत अनेकजण नेहमी चौकशी करत असतात. बुधवारी जेव्हा जोरदार पाऊस झाला तेव्हादेखील चितळे कुटुंबीयांना अनेक फोन आले. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून पाण्याची पातळी वाढली आणि सर्वांचा संपर्कच तुटला.

खरे तर चिपळूणचे माजी नगरसेवक कै. मधुकाका चितळे यांचे चिंचनाका येथे कौलारू बैठ्या पद्धतीचे घर आहे. आता त्यांच्या पश्चात या घरात त्यांचे चिरंजीव प्रभाकर चितळे व विठ्ठल चितळे यांचे कुटुंबीय राहतात. आतापर्यंत या घरात राहूनच त्यांनी अनेकदा पूरपरिस्थितीचा सामना केला आहे. त्याच पद्धतीने हाही पूर निघून जाईल, असे त्यांना वाटले. अगदी पाण्याच्या पातळीत वाढ होऊनही त्यांनी घर सोडले नाही. परंतु, २६ जुलै २००५ची पूररेषा ओलांडल्यानंतर हे कुटुंबीय घाबरून गेले आणि त्यांनी घरातील साहित्याचा विचार न करता गुरुवारी रात्रीच थेट आड्यावर जाऊन बसले. परंतु, शुक्रवारी रात्री १ वाजता आणखी चार फुटाने पाणी वाढल्यानंतर मृत्यूसमोर उभा राहावा, असाच काहीसा अनुभव या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर सकाळी पाण्याची पातळी कमी होताच घर सोडून विरेश्वर कॉलनी येथील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन आधार घेतला. घरात कपडे, धान्य सोडाच मीठही शिल्लक राहिले नसल्याचे चितळे कुटुंबीयांनी सांगितले.