शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

घराच्या आड्यावर दोन रात्र जागवल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचनाका येथील रहिवासी व आतापर्यंतच्या सर्वच महापुरांचे साक्षीदार असलेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे

चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील चिंचनाका येथील रहिवासी व आतापर्यंतच्या सर्वच महापुरांचे साक्षीदार असलेल्या चितळे कुटुंबानी चक्क दोन दिवस घराच्या आड्यावर बसून काढले. तेथेही महापुराचे पाणी पोहोचल्याने ‘आम्ही जवळून पाहिला मृत्यू’, असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव सांगितल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल.

चिपळूण शहराची भौगोलिक रचना एका बशीच्या आकारासारखी आहे. चारही बाजूंनी उंच तर मध्यभागी खोलगट भाग आहे. त्या बशीचे केंद्र म्हणजे चिंचनाका आहे. या चिंचनाक्यात सर्वात पहिले पुराचे पाणी येते. एकदा चिंचनाक्यात पाणी आले, की शहरात पाणी शिरल्याचे शिक्कामोर्तब होते. त्यानंतर प्रशासन व नागरिक पुराचा अंदाज घेऊन उपाययोजना करतात. त्यामुळे पाऊस वाढल्यानंतर सर्वात प्रथम चिंचनाक्यात पाणी भरले आहे का, अशी चौकशी केली जाते. याच चिंचनाक्यात वर्षानुवर्षे राहात असलेल्या चितळे कुटुंबीयांकडे याबाबत अनेकजण नेहमी चौकशी करत असतात. बुधवारी जेव्हा जोरदार पाऊस झाला तेव्हादेखील चितळे कुटुंबीयांना अनेक फोन आले. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून पाण्याची पातळी वाढली आणि सर्वांचा संपर्कच तुटला.

खरे तर चिपळूणचे माजी नगरसेवक कै. मधुकाका चितळे यांचे चिंचनाका येथे कौलारू बैठ्या पद्धतीचे घर आहे. आता त्यांच्या पश्चात या घरात त्यांचे चिरंजीव प्रभाकर चितळे व विठ्ठल चितळे यांचे कुटुंबीय राहतात. आतापर्यंत या घरात राहूनच त्यांनी अनेकदा पूरपरिस्थितीचा सामना केला आहे. त्याच पद्धतीने हाही पूर निघून जाईल, असे त्यांना वाटले. अगदी पाण्याच्या पातळीत वाढ होऊनही त्यांनी घर सोडले नाही. परंतु, २६ जुलै २००५ची पूररेषा ओलांडल्यानंतर हे कुटुंबीय घाबरून गेले आणि त्यांनी घरातील साहित्याचा विचार न करता गुरुवारी रात्रीच थेट आड्यावर जाऊन बसले. परंतु, शुक्रवारी रात्री १ वाजता आणखी चार फुटाने पाणी वाढल्यानंतर मृत्यूसमोर उभा राहावा, असाच काहीसा अनुभव या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर सकाळी पाण्याची पातळी कमी होताच घर सोडून विरेश्वर कॉलनी येथील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन आधार घेतला. घरात कपडे, धान्य सोडाच मीठही शिल्लक राहिले नसल्याचे चितळे कुटुंबीयांनी सांगितले.