शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला मिळणार दोन मंत्रिपदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:52 IST

शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत

प्रकाश वराडकर रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेने पाचपैकी चार जागांवर विजय मिळवला. राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यातच १९९५मधील फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला राबविला जाण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला २ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी ४ आमदारांमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील भास्कर जाधव, उदय सामंत व राजन साळवी हे तीन विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. चिपळूणमधून सदानंद चव्हाण हे विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. मात्र, दापोलीत राष्टÑवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना पराभूत करून योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. गेल्यावेळी शिवसेनेला जिल्ह्यात ३ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी सेनेचे जिल्ह्यात ४ आमदार विजयी झाले आहेत.

शिवसेना-भाजप व मित्रपक्षांचे महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. भाजपची ही राजकीय अगतिकताही स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच शिवसेना सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. या पार्श्वभूमीवर दबाव तंत्राचा वापर शिवसेनेकडून सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला नक्कीच अधिक संख्येत व महत्त्वाची मंत्रीपदे येण्याची दाट शक्यता आहे. यातील मंत्रीपद आपल्या वाट्याला यावे, यासाठी जिल्ह्यातील चारही आमदारांकडून राजकीय फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा होत आहे.

शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. उदय सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपदाची धुराही यशस्वीरित्या सांभाळली आहे. या दोघांनीही त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत विधीमंडळात प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र, मंत्रीपद न भूषविताही गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटविणारे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांचाही पक्षनेतृत्वाला मंत्रीपदासाठी यावेळी विचार करावा लागणार आहे.मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेचजिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील अशी चर्चा असताना त्यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद असण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाचा अनुभव असलेले उदय सामंत व भास्कर जाधव तसेच विधीमंडळ कारभाराचा अनुभव असलेले आक्रमक आमदार राजन साळवी हे तिघेही कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार ठरू शकतात, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना