शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला मिळणार दोन मंत्रिपदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 00:52 IST

शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत

प्रकाश वराडकर रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेने पाचपैकी चार जागांवर विजय मिळवला. राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे आता निश्चित झाले आहे. त्यातच १९९५मधील फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला राबविला जाण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला २ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून, त्यासाठी ४ आमदारांमध्ये पक्षांतर्गत स्पर्धा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यातील भास्कर जाधव, उदय सामंत व राजन साळवी हे तीन विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाले आहेत. चिपळूणमधून सदानंद चव्हाण हे विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. मात्र, दापोलीत राष्टÑवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना पराभूत करून योगेश कदम यांनी बाजी मारली आहे. गेल्यावेळी शिवसेनेला जिल्ह्यात ३ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी सेनेचे जिल्ह्यात ४ आमदार विजयी झाले आहेत.

शिवसेना-भाजप व मित्रपक्षांचे महायुतीचे सरकार राज्यात स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. भाजपची ही राजकीय अगतिकताही स्पष्ट झाली आहे. त्यामुळेच शिवसेना सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. या पार्श्वभूमीवर दबाव तंत्राचा वापर शिवसेनेकडून सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला नक्कीच अधिक संख्येत व महत्त्वाची मंत्रीपदे येण्याची दाट शक्यता आहे. यातील मंत्रीपद आपल्या वाट्याला यावे, यासाठी जिल्ह्यातील चारही आमदारांकडून राजकीय फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा होत आहे.

शिवसेनेच्या चार आमदारांपैकी भास्कर जाधव व उदय सामंत यांनी आधीच मंत्रीपदे भूषविली आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले आहे. उदय सामंत यांनी म्हाडा अध्यक्षपदाची धुराही यशस्वीरित्या सांभाळली आहे. या दोघांनीही त्यांच्या मंत्रीपदाच्या कालावधीत विधीमंडळात प्रभावी कामगिरी केली आहे. मात्र, मंत्रीपद न भूषविताही गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटविणारे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांचाही पक्षनेतृत्वाला मंत्रीपदासाठी यावेळी विचार करावा लागणार आहे.मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेचजिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील अशी चर्चा असताना त्यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद असण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाचा अनुभव असलेले उदय सामंत व भास्कर जाधव तसेच विधीमंडळ कारभाराचा अनुभव असलेले आक्रमक आमदार राजन साळवी हे तिघेही कॅबिनेट मंत्रीपदाचे दावेदार ठरू शकतात, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना