शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मिरकरवाड्यातील झोपड्या हटविणार

By admin | Updated: March 14, 2017 17:37 IST

विभागीय वनअधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस

 आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी : झोपडपट्टीवासियांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे मिरकरवाडा स्मशानभूमी परिसरातील झोपड्या सात दिवसात हटविण्याचे आदेश विभागीय वनअधिकाऱ्यांनी दिले आहेत. येथील १६१ झोपडपट्टीवासियांना ही नोटीस देण्यात आली आहे. मिरकरवाडा परिसरामध्ये अनेक अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत़ या झोपडपट्ट्यांमध्ये बहुतेक लोक खलाशी म्हणून काम करणारे परप्रांतीय राहतात़ या झोपडपट्ट्या उठविण्याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या़ मात्र, अद्यापही या झोपडपट्ट्या जैसे आहेत़ याच भागात स्मशान भूमीशेजारील जमीन वनक्षेत्रासाठी राखीव आहे़ या जमिनीवर उभारण्यात आलेल्या १६१ झोपड्या अनधिकृत आहेत़ वनविभागाने या झोपड्या हटविण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. मात्र, वनविभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर झोपडपट्टीधारकांनी वनविभागाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती़ आता जिल्हा न्यायालयानेही झोपडपट्टीधारकांचा दावा फेटाळून लावला आहे़ त्यामुळे या अनधिकृतपणे झोपड्या तोडण्याची नोटीस विभागीय वनअधिकारी वि़ रा़ जगताप यांनी बजावली आहे़ नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत ही अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडून टाकाव्यात अन्यथा शासकीय खर्चाने काढून टाकून येणारा खर्च वसूल करण्यात येईल, असे वनविभागाने कळविले आहे़ (शहर वार्ताहर) राजकीय पुढाऱ्यांकडे धाव या झोपडपट्टीधारकांना राजकीय लोकांकडून मोठा आधार आहे़ मतांवर डोळा ठेवून राजकीय मंडळी निवडणुकीमध्ये झोपडपट्टीवासियांचा वापर करुन घेतात़ त्यामुळे या झोपडपट्टीधारकांनी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे