शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मिरकरवाड्यातील झोपड्या हटविणार

By admin | Updated: March 14, 2017 17:37 IST

विभागीय वनअधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस

 आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी : झोपडपट्टीवासियांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे मिरकरवाडा स्मशानभूमी परिसरातील झोपड्या सात दिवसात हटविण्याचे आदेश विभागीय वनअधिकाऱ्यांनी दिले आहेत. येथील १६१ झोपडपट्टीवासियांना ही नोटीस देण्यात आली आहे. मिरकरवाडा परिसरामध्ये अनेक अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत़ या झोपडपट्ट्यांमध्ये बहुतेक लोक खलाशी म्हणून काम करणारे परप्रांतीय राहतात़ या झोपडपट्ट्या उठविण्याबाबत प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या़ मात्र, अद्यापही या झोपडपट्ट्या जैसे आहेत़ याच भागात स्मशान भूमीशेजारील जमीन वनक्षेत्रासाठी राखीव आहे़ या जमिनीवर उभारण्यात आलेल्या १६१ झोपड्या अनधिकृत आहेत़ वनविभागाने या झोपड्या हटविण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. मात्र, वनविभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर झोपडपट्टीधारकांनी वनविभागाविरुध्द न्यायालयात धाव घेतली होती़ आता जिल्हा न्यायालयानेही झोपडपट्टीधारकांचा दावा फेटाळून लावला आहे़ त्यामुळे या अनधिकृतपणे झोपड्या तोडण्याची नोटीस विभागीय वनअधिकारी वि़ रा़ जगताप यांनी बजावली आहे़ नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत ही अतिक्रमण केलेल्या झोपड्या पाडून टाकाव्यात अन्यथा शासकीय खर्चाने काढून टाकून येणारा खर्च वसूल करण्यात येईल, असे वनविभागाने कळविले आहे़ (शहर वार्ताहर) राजकीय पुढाऱ्यांकडे धाव या झोपडपट्टीधारकांना राजकीय लोकांकडून मोठा आधार आहे़ मतांवर डोळा ठेवून राजकीय मंडळी निवडणुकीमध्ये झोपडपट्टीवासियांचा वापर करुन घेतात़ त्यामुळे या झोपडपट्टीधारकांनी राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडे धाव घेतली आहे