शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराचा गेलेला जीव परत येणार आहे का : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू कशी ठेवली, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला सामंत यांनी विचारत धारेवर धरले. कामगाराचा जीव गेलाय तो परत कोण देणार? या कामगारांना भरीव नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असे कंपनी प्रशासनाला सामंत यांनी ठणकावून सांगितले.

फिश मिल कंपनीमध्ये असणाऱ्या ड्रायरमध्ये अडकून संतोष घवाळी या कामगाराचा मृत्यू झाला असून, सुमित पांचाळ जखमी झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी कामगाराची विचारपूस केली.

या भेटीच्या वेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी व शिवसेनेचे राजू तोडणकर, वैभव पाटील उपस्थित होते. कंपनीबाबत अनेक तक्रारींचा पाढा येथे जमलेल्या ग्रामस्थांनी वाचला. प्रचंड दुर्गंधीयुक्त वातावरणात येथील कामगार काम करतात. या कंपनीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी असते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी मिरजोळे ग्रामपंचायतीने या कंपनीला कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू ठेवल्याबाबत नोटीस दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मृताच्या नातेवाइकांना १० लाख

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कंपनीच्या मालकाची कानउघडणी केल्यानंतर त्यांना जाग आली. कंपनी मालकाने उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून आपण मृताच्या नातेवाइकांना १० लाखांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे.