शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कामगाराचा गेलेला जीव परत येणार आहे का : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहराजवळ असणाऱ्या मिरजोळे ग्रामपंचायत हद्दीतील टी. जे. मरिन कंपनीतील अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू कशी ठेवली, असा प्रश्न कंपनी प्रशासनाला सामंत यांनी विचारत धारेवर धरले. कामगाराचा जीव गेलाय तो परत कोण देणार? या कामगारांना भरीव नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, असे कंपनी प्रशासनाला सामंत यांनी ठणकावून सांगितले.

फिश मिल कंपनीमध्ये असणाऱ्या ड्रायरमध्ये अडकून संतोष घवाळी या कामगाराचा मृत्यू झाला असून, सुमित पांचाळ जखमी झाला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात जाऊन जखमी कामगाराची विचारपूस केली.

या भेटीच्या वेळी नगराध्यक्ष प्रदीप साळवी व शिवसेनेचे राजू तोडणकर, वैभव पाटील उपस्थित होते. कंपनीबाबत अनेक तक्रारींचा पाढा येथे जमलेल्या ग्रामस्थांनी वाचला. प्रचंड दुर्गंधीयुक्त वातावरणात येथील कामगार काम करतात. या कंपनीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी असते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी मिरजोळे ग्रामपंचायतीने या कंपनीला कोविड नियमांचे उल्लंघन करून कंपनी सुरू ठेवल्याबाबत नोटीस दिली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मृताच्या नातेवाइकांना १० लाख

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कंपनीच्या मालकाची कानउघडणी केल्यानंतर त्यांना जाग आली. कंपनी मालकाने उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून आपण मृताच्या नातेवाइकांना १० लाखांची मदत देणार असल्याचे सांगितले आहे.