शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी वाढीव निधी मिळवणार

By admin | Updated: January 28, 2015 00:53 IST

रवींद्र वायकर : रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीची बैठक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा वर्ष २०१५-१६च्या १२७ कोटी १६ लाख रुपयांच्या मूळ आराखड्यात वाढ करुन २२७ कोटी रुपयांचा सुधारित वाढीव आराखडा सादर करण्याचा निर्णय पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मंगळवारी घेण्यात आला. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यटनवृद्धी अशा पायाभूत विकासयोजनांवर लक्ष केंद्रीत करणारा हा वाढीव विकास आराखडा असल्याचे सांगून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचा आपला सर्वतोपरी प्रयत्न राहिल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच चालू आर्थिक वर्षांच्या १५० कोटींच्या जिल्हा नियोजन निधीत शासनाने कोणतीही कपात केली नसल्याचे स्पष्ट केले. लोकांची नेमकी गरज लक्षात घेऊन योजना तयार करण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या मागणीनुसार आता २२७ रुपयांचा वाढीव आराखडा शासनाला सादर करण्यात येणार आहे.नियोजन समितीने सादर केलेल्या १२७ कोटी १६ लाख रुपयांच्या मूळ आराखड्यात गाभाक्षेत्रांतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी १३ कोटी १६ लाख, ग्रामीण विकासासाठी १४ कोटी ६१ लाख आणि सामाजिक व सामूहिक सेवांसाठी ५२ कोटी ७० लाख अशी सुमारे ८० कोटी ४७ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बिगर गाभा क्षेत्रांतर्गत पाटबंधारे आणि पूरनियंत्रणाच्या कामासाठी १ कोटी ४६ लाख, ऊर्जा विकासासाठी १ कोटी ५२ लाख, उद्योग व खाणकामासाठी ६० लाख, परिवहनसाठी ३२ कोटी, सामान्य आर्थिक सेवांसाठी ४ कोटी ३० लाख, माहिती व प्रसिद्धीसाठी ४५ लाख असे एकूण ४० कोटी ३३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. गाभा व बिगर गाभाक्षेत्रासाठी एकूण ९५ टक्के म्हणजे १२० कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. उर्वरित ५ टक्के म्हणजे ६ कोटी ३६ लाख लाख रुपये नाविन्यपूर्ण योजनांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. सुधारित वाढीव आराखडा मंजूर झाल्यानंतर विकासयोजनांच्या शीर्षनिहाय खर्चात वाढ होणार असल्याची माहितीही पालकमंत्री वायकर यांनी दिली. आदिवासी विकास उपयोजनाबाह्य क्षेत्रासाठी १ कोटी १६ लाख रुपयांचा प्रारुप आराखडा प्रस्तावित केला होता, तो आता २ कोटी २५ लाख करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलपे उपस्थित होते.(प्रतिनिधी)