शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट घातक का ठरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

जिल्ह्याला हा दिलासा मिळत असतानाच मार्च महिन्यात होणाऱ्या शिमगोत्सवात काळजी घ्या, असा सल्लाही आरोग्य विभागाकडून मिळत होता. मात्र, काही ...

जिल्ह्याला हा दिलासा मिळत असतानाच मार्च महिन्यात होणाऱ्या शिमगोत्सवात काळजी घ्या, असा सल्लाही आरोग्य विभागाकडून मिळत होता. मात्र, काही गावांच्या, व्यक्तींच्या अट्टाहासामुळे शिमगाेत्सवात लाेकांनी दाखवलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचे संकट पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. तसं पाहिलं तर डिसेंबर महिन्यापर्यंत घरातच अडकलेल्या लोकांनी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात पर्यटनाला जाण्याचे बेत केले. ये-जा वाढली. त्यामुळे कोरोनाचे पुन्हा दबक्या पावलांनी ‘कम बॅक’ झालेलेच हाेते. त्यात भर पडली ती शिमगोत्सवावेळी पुन्हा हाॅटस्पाॅट असलेल्या मुंबई - पुणेसारख्या शहरातून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतरच्या कोरोनाचे दुसऱ्या लाटेत रूपही बदललेले होते. यात कोरोनाची लक्षणे सौम्य असली तरी त्याचा संसर्ग जलद गतीने फैलावणारा असल्याने बाधित हाेणाऱ्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कंबर कसून उभी राहिली.

यात धोकादायक ठरलेली परिस्थिती म्हणजे साैम्य किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्या व्यक्तींना शासनानेच घरात राहून उपचार घेण्याची परवानगी दिल्याने ज्यांच्यात लक्षणे नव्हती किंवा कमी लक्षणे होती, अशा व्यक्ती बाहेर फिरू लागल्या. पूर्वीसारखे त्या घरावर शिक्का मारणे किंवा तो परिसर सील करणे हे नियम राहिले नसल्याने काहींच्या हे पथ्यावर पडले. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांनी घरातले आणि बाहेर संपर्कात येणारे यांनाही एकाचवेळी बाधित करण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. अजूनही जलदगतीने होणाऱ्या फैलावामुळे मार्च २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत रूग्णांची संख्या होती १०,२८१ आणि मृत्यू झालेल्यांची संख्या होती ३७१. मात्र, त्यानंतर नागरिकांनीच बेफिकिरी दाखविल्याने त्यानंतरच्या ३ महिन्यात रूग्णसंख्या पोहोचलीय ४५,३१३वर आणि मृत्यू झालेत १,५४५. निदान आता तरी यातून धडा घेऊया.