शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:08 IST

कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.

ठळक मुद्देसंपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणेराज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीत रत्नागिरीही

रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेले भाजप उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक शहरे उदयाला येऊन भरभराटीला आली. त्या शहरांमध्ये कारखानदारी आली. व्यापार वाढला. नवीन वसाहती उभ्या राहिल्या. त्या शहरांना ज्या मुख्य १८ सुविधा आवश्यक होत्या त्या पुरविल्या गेल्या.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत. परंतुु रत्नागिरी इतके जुने व ऐतिहासिक शहर असूनही येथील तरुणांच्या हाताला रोजगार, नवीन उद्योग येथे आले नाहीत. भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक प्रभागांमधील उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचा उपद्रव मोठा आहे. अतिशय निसर्गरम्य शहर असूनही येथे रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य अशा १८ चांगल्या नागरी सुविधांसह हे शहर स्वच्छ सुंदर बनविता आले असते. पण शिवसेनेकडून काहीच झाले नाही.रत्नागिरी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का, नागरिकांना सुरक्षितता आहे का, याचा विचार करता नगर परिषदेतील शिवसेनेचे नेते याला जबाबदार आहेत. मुंबई ही देशातील सर्वात भ्रष्ट महानगर पालिका म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे नावही आहे. त्यामुळे या शहराचा कायापालट करायचा असेल तर जनतेने मतांचे परिवर्तन करावे, भाजपचे उमेदवार पटवर्धन यांना संधी द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.रत्नागिरी शहर विकासाच्या बाबतीत मागे राहिले, याला येथे अनेक वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता हे कारण आहे. येथील नगर परिषद व जिल्हा परिषद अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तरीही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. १८ नागरी सुविधांसह रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर बनविता आले असते. परंतु या नगर परिषदेमध्ये सत्तेत बसलेल्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. कारभार करणारे तेवढे धनाढ्य झाले, असा घणाघाती आरोपही राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरी