शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:08 IST

कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.

ठळक मुद्देसंपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणेराज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीत रत्नागिरीही

रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेले भाजप उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक शहरे उदयाला येऊन भरभराटीला आली. त्या शहरांमध्ये कारखानदारी आली. व्यापार वाढला. नवीन वसाहती उभ्या राहिल्या. त्या शहरांना ज्या मुख्य १८ सुविधा आवश्यक होत्या त्या पुरविल्या गेल्या.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत. परंतुु रत्नागिरी इतके जुने व ऐतिहासिक शहर असूनही येथील तरुणांच्या हाताला रोजगार, नवीन उद्योग येथे आले नाहीत. भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक प्रभागांमधील उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचा उपद्रव मोठा आहे. अतिशय निसर्गरम्य शहर असूनही येथे रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य अशा १८ चांगल्या नागरी सुविधांसह हे शहर स्वच्छ सुंदर बनविता आले असते. पण शिवसेनेकडून काहीच झाले नाही.रत्नागिरी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का, नागरिकांना सुरक्षितता आहे का, याचा विचार करता नगर परिषदेतील शिवसेनेचे नेते याला जबाबदार आहेत. मुंबई ही देशातील सर्वात भ्रष्ट महानगर पालिका म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे नावही आहे. त्यामुळे या शहराचा कायापालट करायचा असेल तर जनतेने मतांचे परिवर्तन करावे, भाजपचे उमेदवार पटवर्धन यांना संधी द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.रत्नागिरी शहर विकासाच्या बाबतीत मागे राहिले, याला येथे अनेक वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता हे कारण आहे. येथील नगर परिषद व जिल्हा परिषद अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तरीही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. १८ नागरी सुविधांसह रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर बनविता आले असते. परंतु या नगर परिषदेमध्ये सत्तेत बसलेल्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. कारभार करणारे तेवढे धनाढ्य झाले, असा घणाघाती आरोपही राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरी