शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:08 IST

कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.

ठळक मुद्देसंपूर्ण कोकण भाजपमय करायचा आहे : नारायण राणेराज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीत रत्नागिरीही

रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आमच्यासाठी मोठीच आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणूकही मोठीच आहे. परंतु केवळ या निवडणूक प्रचारासाठी आलेलो नाही तर कोकण यापुढे भाजपमय करावयाचा आहे. त्यासाठी आलो आहे, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे सांगितले.रत्नागिरी नगराध्यक्ष निवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेले भाजप उमेदवार अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० ते १५ वर्षांत अनेक शहरे उदयाला येऊन भरभराटीला आली. त्या शहरांमध्ये कारखानदारी आली. व्यापार वाढला. नवीन वसाहती उभ्या राहिल्या. त्या शहरांना ज्या मुख्य १८ सुविधा आवश्यक होत्या त्या पुरविल्या गेल्या.

राज्यात अशी अनेक शहरे आहेत. परंतुु रत्नागिरी इतके जुने व ऐतिहासिक शहर असूनही येथील तरुणांच्या हाताला रोजगार, नवीन उद्योग येथे आले नाहीत. भुयारी गटार योजना नाही. प्रत्येक प्रभागांमधील उघड्या गटारांमुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डासांचा उपद्रव मोठा आहे. अतिशय निसर्गरम्य शहर असूनही येथे रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य अशा १८ चांगल्या नागरी सुविधांसह हे शहर स्वच्छ सुंदर बनविता आले असते. पण शिवसेनेकडून काहीच झाले नाही.रत्नागिरी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का, नागरिकांना सुरक्षितता आहे का, याचा विचार करता नगर परिषदेतील शिवसेनेचे नेते याला जबाबदार आहेत. मुंबई ही देशातील सर्वात भ्रष्ट महानगर पालिका म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे राज्यातील भ्रष्ट नगर परिषदांच्या यादीमध्ये रत्नागिरी नगर परिषदेचे नावही आहे. त्यामुळे या शहराचा कायापालट करायचा असेल तर जनतेने मतांचे परिवर्तन करावे, भाजपचे उमेदवार पटवर्धन यांना संधी द्यावी, असे आवाहन राणे यांनी केले.रत्नागिरी शहर विकासाच्या बाबतीत मागे राहिले, याला येथे अनेक वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता हे कारण आहे. येथील नगर परिषद व जिल्हा परिषद अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तरीही शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. १८ नागरी सुविधांसह रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर बनविता आले असते. परंतु या नगर परिषदेमध्ये सत्तेत बसलेल्यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केले नाही. कारभार करणारे तेवढे धनाढ्य झाले, असा घणाघाती आरोपही राणे यांनी केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Ratnagiriरत्नागिरी