शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भावी सैनिकांसाठी कोल्हापूरची 'व्हाईट आर्मी अन्नपूर्णा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:53 IST

आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.

ठळक मुद्देविशेष सहकार्य रत्नागिरी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांचे लाभले.

रत्नागिरी:   सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापुरातील व्हाईट आर्मी च्या वतीने सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारले होते, या दहा दिवसांत भरतीसाठी आलेल्या 21 हजार तरुणांनी या मोफत अन्नछत्राचा लाभ घेतला. मागील 14 वर्षा पासून सुरू असलेल्या अन्नछत्रमध्ये आज अखेर भरतीसाठी आलेल्या पाच लाख तरुणांनी लाभ घेतला. रत्नागिरी येथे छ. शिवाजी स्टेडियम येथे भरती प्रक्रियांमध्ये पुणे विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, अहमदनगर तसेच रत्नागिरी, सांगली, सातारा,  कोल्हापूर, सिंधुदुर्ग, व गोवा राज्यातील हजारो मुलांची सैन्य भरती प्रक्रिया घेण्यात आली. खासकरून एआरओ ऑफीस चे कर्नल अनुराग सक्सेना यांनी भरती काळात भरतीसाठी आलेल्या मुलांना अन्नछत्र उभारण्यासाठी व्हाईट आर्मी स विनंती करण्यात आली होती. आज अखेर स्थलसेना, वायुसेना, 109 टी ए मराठा बटालियन, हरित सेना, सी आर पी एफ, पोलीस यांच्या भरती वेळी भरतीसाठी आलेल्या सैन्यभरती मोफत अन्नछत्र उभारून मुलांना भोजनाची सोय केली आहे.व्हाईट आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत शेंडे हणमंत कुलकर्णी यांच्या नियोजना अंतर्गत सुनील जाधव, सुमित साबळे,प्रेम पोवार, अविनाश भांडवले, प्रकाश पाटील, विकी खेडेकर, आदेश कांबळे, संतोष यादव, सुशांत पाटील, आणि देवचंद कॉलेज निपाणी चे विक्रम भोसले, ऋषिकेश कुंकेकर, आशितोष कावरे, गणेश परीट, व्यंकटेश घोडके, सुरज चोपडे, ओंकार चोपडे, ओंकार कोपर्डे, सतीश आंबी इत्यादींनी विशेष सहभाग घेतला.ररत्नागिरी स्थलसेना भरतीसाठी रत्नागिरी येथील नितीन सतोसकर, सुनील बोगाळे, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्ड मित्र मंडळ सेवा भावी संस्थेचे किरण आरदाळकर, कुमार आहुजा, विवेक शेटे, राजेश मसाले, संजय कामत यांनी विशेष मदत केली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfoodअन्नRatnagiriरत्नागिरी