शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काम सुरू असतानाच महावितरणचा खांब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:43 IST

नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.

ठळक मुद्देकाम सुरू असतानाच महावितरणचा खांब कोसळलासुदैवाने एकजण बालंबाल बचावला, पूर्व कल्पना न देताच काम सुरू

रत्नागिरी : नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.सोमवार हा दिवस महावितरणसाठी देखभाल, दुरूस्तीसाठी ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे यादिवशी जास्तीत जास्त कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. शहरातील हॉटेल कार्निव्हलजवळ नव्याने वीजखांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा खांब बसविण्यासाठी जुन्या खांबावरील तारा कापण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू होते. यातील काही तारा कापल्यानंतर हॉटेलच्या शेजारी उभ्या असणाऱ्या वीजखांबावर तारांचा भार आला. त्याबरोबर हा खांब वाकून जमिनीवर कोसळला.दरम्यान, याठिकाणी अन्य दुकाने व कार्यालय असल्याने वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली असतात. मात्र, हे काम करताना तेथील नागरिकांना कोणतीच कल्पना न दिल्याने ही वाहने तेथेच उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा खांब कोसळल्यानंतर त्याचठिकाणी उभी करून ठेवलेली चारचाकी गाडी सुदैवाने बचावली. हा खांब कोसळला त्याचवेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का कोसळला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला किरकोळ दुखापती झाली असून, जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकारानंतर वाहतूक शाखेचे पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले होते. तर खांब खाली कोसळताच तेथील नागरिकांनी बाहेर येऊन याबाबत विचारणा केली. याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोसळलेल्या खांबावरील तारा बाजूला करण्याचे काम हाती घेतले. पण याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते बराचवेळ तेथे न आल्याने नागरिक संतप्त झाले होते.

हे काम करण्यापूर्वी येथील नागरिकांना का सांगण्यात आले नाही? कामाची पूर्वकल्पना दिली असती तर वाहने हटविता आली असती, असेही नागरिकांनी सांगितले. वाहनांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, जबाबदार अधिकारीच न आल्याने त्यांना उत्तरे मिळत नव्हती.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी