शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

काम सुरू असतानाच महावितरणचा खांब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:43 IST

नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.

ठळक मुद्देकाम सुरू असतानाच महावितरणचा खांब कोसळलासुदैवाने एकजण बालंबाल बचावला, पूर्व कल्पना न देताच काम सुरू

रत्नागिरी : नवीन पोल बसविण्याचे काम सुरू असतानाच एका वीजखांबावरील तारा तोडण्यात आल्याने दुसऱ्या खांबावर भार आल्याने तो खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्याने रत्नागिरी शहरातील हॉटेल कार्निव्हल येथे घडली. याठिकाणी पार्किंग करून ठेवण्यात आलेली वाहने थोडक्यात बचावली त्याचबरोबर हा खांब एका दुचाकीस्वारावर कोसळल्याने तो किरकोळ जखमी झाला. या कामाची पूर्व कल्पना न देताच सुरू केल्याचा आरोप याठिकाणच्या नागरिकांनी केला.सोमवार हा दिवस महावितरणसाठी देखभाल, दुरूस्तीसाठी ठेवण्यात आलेला असतो. त्यामुळे यादिवशी जास्तीत जास्त कामे करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. शहरातील हॉटेल कार्निव्हलजवळ नव्याने वीजखांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा खांब बसविण्यासाठी जुन्या खांबावरील तारा कापण्याचे काम सोमवारी सकाळी सुरू होते. यातील काही तारा कापल्यानंतर हॉटेलच्या शेजारी उभ्या असणाऱ्या वीजखांबावर तारांचा भार आला. त्याबरोबर हा खांब वाकून जमिनीवर कोसळला.दरम्यान, याठिकाणी अन्य दुकाने व कार्यालय असल्याने वाहने पार्किंग करून ठेवण्यात आलेली असतात. मात्र, हे काम करताना तेथील नागरिकांना कोणतीच कल्पना न दिल्याने ही वाहने तेथेच उभी करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे हा खांब कोसळल्यानंतर त्याचठिकाणी उभी करून ठेवलेली चारचाकी गाडी सुदैवाने बचावली. हा खांब कोसळला त्याचवेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का कोसळला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला किरकोळ दुखापती झाली असून, जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकारानंतर वाहतूक शाखेचे पोलीसही त्याठिकाणी दाखल झाले होते. तर खांब खाली कोसळताच तेथील नागरिकांनी बाहेर येऊन याबाबत विचारणा केली. याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोसळलेल्या खांबावरील तारा बाजूला करण्याचे काम हाती घेतले. पण याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते बराचवेळ तेथे न आल्याने नागरिक संतप्त झाले होते.

हे काम करण्यापूर्वी येथील नागरिकांना का सांगण्यात आले नाही? कामाची पूर्वकल्पना दिली असती तर वाहने हटविता आली असती, असेही नागरिकांनी सांगितले. वाहनांचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, जबाबदार अधिकारीच न आल्याने त्यांना उत्तरे मिळत नव्हती.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी