शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

पाऊस थांबल्यावर महिन्याभरात रस्ते चकाचक होणारच : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात ...

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात आलेले चर आणि तुफान पाऊस यामुळे यावर्षी अधिक खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रत्नागिरीतील रस्ते चकाचक केले जातील, हे मी आधी सांगितले आहे आणि तो माझा रत्नागिरीकरांसाठी शब्द आहे, असे उद्गार उच्च व मंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.

गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्यांबाबत बोलतानाच विरोधकांवर टीकाही केली. आपल्या जुन्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यात आपण जे सांगितले, त्यावर आपण ठाम आहोत. रत्नागिरीतील रस्ते चकाचक होतील, यात शंकाच नाही. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रस्ते केले जातील, यावर आपण आजही ठाम आहोत, असे ते म्हणाले. मात्र हे रत्नागिरीच्या संस्कृतीला साजेसे राजकारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता लागली तरीही रत्नागिरी शहरातील कोणतीही कामे अडणार नाहीत. तब्बल ५६ कामांच्या वर्कऑर्डर तयार आहेत. त्यासाठी निधी मंजूर आहे. आता फक्त पावसाळा संपण्याची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले.