शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

पाऊस थांबल्यावर महिन्याभरात रस्ते चकाचक होणारच : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात ...

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांची स्थिती भयावह आहे, ही बाब कोणी अमान्य करणार नाही. टेलिफोन केबल, पाणी योजना, गॅससाठी खोदण्यात आलेले चर आणि तुफान पाऊस यामुळे यावर्षी अधिक खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रत्नागिरीतील रस्ते चकाचक केले जातील, हे मी आधी सांगितले आहे आणि तो माझा रत्नागिरीकरांसाठी शब्द आहे, असे उद्गार उच्च व मंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.

गुरुवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी रस्त्यांबाबत बोलतानाच विरोधकांवर टीकाही केली. आपल्या जुन्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. त्यात आपण जे सांगितले, त्यावर आपण ठाम आहोत. रत्नागिरीतील रस्ते चकाचक होतील, यात शंकाच नाही. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. पाऊस थांबल्यानंतर महिन्याभरात रस्ते केले जातील, यावर आपण आजही ठाम आहोत, असे ते म्हणाले. मात्र हे रत्नागिरीच्या संस्कृतीला साजेसे राजकारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता लागली तरीही रत्नागिरी शहरातील कोणतीही कामे अडणार नाहीत. तब्बल ५६ कामांच्या वर्कऑर्डर तयार आहेत. त्यासाठी निधी मंजूर आहे. आता फक्त पावसाळा संपण्याची प्रतीक्षा आहे, असे ते म्हणाले.