शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अर्धवट, घुसमटलेली कामे हा विकासाचा कोणता टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

रत्नागिरी : शहरातील उखडलेले रस्ते, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, बसस्थानकाचे ठप्प पडलेले काम, पाणी योजना मुदत ...

रत्नागिरी : शहरातील उखडलेले रस्ते, बंद पडत असलेल्या मराठी शाळा, बसस्थानकाचे ठप्प पडलेले काम, पाणी योजना मुदत वाढीत घुसमटली असून रत्नागिरी शहराच्या विकासाचा हा नेमका कोणता टप्पा असल्याची कडवट प्रतिक्रिया भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी शहरातील रस्ते उखडून तीन महिने झाले. धुळीचे साम्राज्य सर्वत्र असून रस्त्यावरून चालताही येत नाही, रस्त्यात मोकाट जनावरांचा संचार ही रत्नागिरीनगराची ओळख झाली आहे. चार वर्षे लोटली तरी पाणी योजना मुदतवाढीच्या गर्तेत अडकली आहे. नागरिक मात्र पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. मुदतवाढ, त्यातून रक्कमवाढ या दुष्टचक्रात रत्नागिरीची पाणी योजना फसली असून नेमकी पूर्तता कधी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रत्नागिरी एस. टी. बसस्थानक हे आणखी एक विकासाचे उदाहरण आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादी जुनी पडीक वास्तू असावी, तशी या बसस्थानकाची अवस्था झाली आहे. शहराला विद्रूप स्वरूपात पुढे आणण्याचा खटाटोप सुरू असावा, असे चित्र निर्माण झाले आहे. गेले कित्येक महिने हे काम पुढे सरकत नाही. बसस्थानकाच्या या कामामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, प्रवाशांची गैरसोय याकडे सत्ताधीशांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

शहरातील मराठी शाळा या एक-एक करून इतिहास जमा होत आहेत. लोकमान्य टिळकांची शाळा, तिची दोन मजली इमारत जमीनदोस्त झाली. तिथे परत शाळा होणार? की लोकमान्य टिळकांची शाळा म्हणून प्रसिद्ध ही शाळा आता केवळ इतिहास जमा होणार? आगाशे कन्या शाळा बंद झाली. अशा काही शाळा बंद होत आहेत. या शाळाबद्दल नेमकी भूमिका काय, भविष्यातील नियोजन काय, याबाबत नेमकी उदासीनता कशासाठी, असे प्रश्न त्यांनी केले आहेत. जनतेने सातत्याने विश्वास ठेवत सत्ताधीशांना निवडून दिले. मात्र, रत्नागिरीतील प्रश्नांबाबत नेमके काय सुरू आहे? उखडलेले रस्ते, प्रलंबित पाणी योजना, बंद पडत चाललेल्या शाळा, ठप्प पडलेले एस.टी. बसस्थानकाचे काम हा विकासाचा कोणता टप्पा आहे? हेच समजत नसल्याची बोचरी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.