शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आठवडा बाजार बंद; मात्र भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

शहरात भाजी खरेदीसाठी कोरोना नियमावलींचे पालन होत नाही. विक्रेते, ग्राहक विनामास्क असतात. मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ...

शहरात भाजी खरेदीसाठी कोरोना नियमावलींचे पालन होत नाही. विक्रेते, ग्राहक विनामास्क असतात.

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यातील आठवडा बाजार अद्याप बंद आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आठवडा बाजारांना अद्याप प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, शहरातील नाक्यानाक्यांवर भाजी विक्री सुरू असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. भाजी खरेदीसाठी आलेले ग्राहक, तसेच विक्रेत्यांमध्ये हलगर्जीपणा निदर्शनास येत आहे. मास्क ताेंडाऐवजी हनुवटीला अडकविले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

शहरातील पोस्ट कार्यालय, गोखलेनाका, आठवडा बाजार, बसस्थानक, माळनाका, मारुती मंदिर, साळवी स्टाॅप, कोकण नगर, नाचणे रोड, उद्यमनगर, कुवारबाव परिसरात भाजीविक्रेते स्टाॅल लावत आहेत. भाज्यांसह, कांदा, बटाटा, फळांची विक्री करण्यात येत आहे. खरेदीसाठी येणाऱ्या बहुतांश ग्राहकांना घाई असल्याने खरेदीसाठी रांगेत थांबायला वेळ नसतो. प्रत्येकजण प्रथम आपल्याला भाजी मिळावी, यासाठी घाई करतो. त्यामुळे विक्रेत्यांचीही गडबड उडते. विक्रेते, ग्राहकांकडून मास्क नाका-तोंडाला लावण्याऐवजी हनुवटीला अडकविला जातो. परिणामी संक्रमण कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका आहे. गर्दीत जाऊन खरेदी करताना तरी किमान दक्षता घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

साळवी स्टाॅप येथे गर्दी

साळवीस्टाॅप, मारुतीमंदिर परिसरात नोकरदार वर्गाला भाज्या, फळे खरेदी करणे सोयीस्कर ठरत आहे. त्यामुळे परिसरातील विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी होत आहे. आधीच्या ग्राहकाची भाजी खरेदी सुरू असतानाच मागून येऊन अनेक ग्राहक घाई करतात. विक्रेते रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर ठाण मांडत आहेत. विक्रीवेळी ग्राहक व विक्रेते यांना मास्क लावण्याचा विसर पडत आहे.

जणू बाजार फुलतो

शहराजवळील कोकणनगर परिसरातील नागरीवस्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा भाजी, फळे, कांदा-बटाटा विक्रेत्यांनी स्टाॅल मांडले आहेत. सकाळी ९ ते ४ या वेळेत विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची होणारी गर्दी पाहता जणू बाजार फुलल्याचा प्रत्यय येत आहे. कोराेना नियमावलींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

कुवारबाव येथे बाजार

कुवारबाव परिसरातही रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते स्टाॅल लावत असून, ग्राहकांची सकाळच्या सत्रात खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता बाजार भरल्याचे जाणवते. कोरोना जणू संपल्याचाच प्रत्यय येतो. वास्तविक, संक्रमण वाढण्याचा धोका असताना त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बाजारातील विक्रेते, ग्राहक विनामास्क आढळल्यास त्यावर कारवाई होत नसल्यानेच फावले आहे.

खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या ग्राहकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. शहरातील नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्त आहे. शिवाय नगर परिषदेची पथकेही बाजारात फिरत असतात. शासकीय नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही मास्क तोंडावरून काढून हनुवटीला अडकवून बाजारातील गर्दीत ग्राहक मिसळतात. वाहनातून भाजी विक्रीसाठी आणणारे विक्रेतेही मास्क वापरणे टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोरोनामुळे गेले दीड वर्ष आठवडा बाजार बंद आहेत. बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही; परंतु विक्रेत्यांनी ठिकठिकाणी स्टाॅल लावले आहेत. त्याठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी गर्दी न करता, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर काही प्रमाणात खाली आला आहे; परंतु हे प्रमाण शून्यावर येण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

- प्रदीप साळवी, नगराध्यक्ष, रत्नागिरी.