शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू

By admin | Updated: March 8, 2017 14:00 IST

राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करूराहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिकारत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी ६१ कोटी ९ लाख २७ हजार ६१६ रुपये खर्चाची सुधारित नळपाणी योजना ही पुढील २० ते २५ वर्षांतील शहराचा विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिलेल्या या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून ही योजना मार्गी लावण्यात खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यामुळेच या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. येत्या दीड वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, आरोग्य समिती सभापती स्मितल पावसकर उपस्थित होते. या योजनेचा पहिल्या टप्प्यातील १७ कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुढील निधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खासदार राऊत व राज्य शासनाच्या अंदाज समितीचे सभापती आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुुळे या योजनेतील संभाव्य अडथळे आता दूर झाले आहेत. या योजनेतून सर्वप्रथम शीळ धरणापासून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रादरम्यानची साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलली जाणार आहे. सध्याची वाहिनी खराब झाल्याने पाणी गळतीचे, जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्या नवीन जलवाहिनीमुळे सुटेल व पाण्याची गळती थांबून रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळेल. रत्नागिरीतील साठवण टाक्या, शहरातील पाणी वितरण जलवाहिन्यांचे खराब झालेले जाळे बदलणे, नाचणे व साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, पानवल धरणाची नव्याने उभारणी, पानवल धरणापासून नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणे, यासारखी कामे या सुधारित नळपाणी योजनेत प्राधान्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेणारटोर्इंग केलेल्या वाहनांसाठीची जागा नगर परिषदेची आहे. या जागेच्या प्रवेशद्वाराला नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार कुलुप लावण्यात आले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ही जागा टोर्इंग केलेली वाहने ठेवण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरातील वाहनधारक, व्यापारी, फेरीवाले तसेच अन्य घटकांच्याही काही समस्या आहेत. त्यामुळे लवकरच वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेऊ.