शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू

By admin | Updated: March 8, 2017 14:00 IST

राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करूराहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिकारत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी ६१ कोटी ९ लाख २७ हजार ६१६ रुपये खर्चाची सुधारित नळपाणी योजना ही पुढील २० ते २५ वर्षांतील शहराचा विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिलेल्या या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून ही योजना मार्गी लावण्यात खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यामुळेच या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. येत्या दीड वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, आरोग्य समिती सभापती स्मितल पावसकर उपस्थित होते. या योजनेचा पहिल्या टप्प्यातील १७ कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुढील निधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खासदार राऊत व राज्य शासनाच्या अंदाज समितीचे सभापती आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुुळे या योजनेतील संभाव्य अडथळे आता दूर झाले आहेत. या योजनेतून सर्वप्रथम शीळ धरणापासून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रादरम्यानची साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलली जाणार आहे. सध्याची वाहिनी खराब झाल्याने पाणी गळतीचे, जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्या नवीन जलवाहिनीमुळे सुटेल व पाण्याची गळती थांबून रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळेल. रत्नागिरीतील साठवण टाक्या, शहरातील पाणी वितरण जलवाहिन्यांचे खराब झालेले जाळे बदलणे, नाचणे व साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, पानवल धरणाची नव्याने उभारणी, पानवल धरणापासून नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणे, यासारखी कामे या सुधारित नळपाणी योजनेत प्राधान्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेणारटोर्इंग केलेल्या वाहनांसाठीची जागा नगर परिषदेची आहे. या जागेच्या प्रवेशद्वाराला नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार कुलुप लावण्यात आले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ही जागा टोर्इंग केलेली वाहने ठेवण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरातील वाहनधारक, व्यापारी, फेरीवाले तसेच अन्य घटकांच्याही काही समस्या आहेत. त्यामुळे लवकरच वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेऊ.