शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करू

By admin | Updated: March 8, 2017 14:00 IST

राहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिका

नळपाणी योजना दीड वर्षात पूर्ण करूराहुल पंडितांची माहिती : योजनेतील त्रुटी दूर करण्यात राऊत, सामंतांची महत्त्वाची भूमिकारत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी ६१ कोटी ९ लाख २७ हजार ६१६ रुपये खर्चाची सुधारित नळपाणी योजना ही पुढील २० ते २५ वर्षांतील शहराचा विस्तार लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. शासनाने मंजुरी दिलेल्या या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून ही योजना मार्गी लावण्यात खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांची प्रमुख भूमिका आहे. त्यांच्यामुळेच या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. येत्या दीड वर्षांत ही योजना पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, आरोग्य समिती सभापती स्मितल पावसकर उपस्थित होते. या योजनेचा पहिल्या टप्प्यातील १७ कोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. पुढील निधी मिळेल की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, खासदार राऊत व राज्य शासनाच्या अंदाज समितीचे सभापती आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुुळे या योजनेतील संभाव्य अडथळे आता दूर झाले आहेत. या योजनेतून सर्वप्रथम शीळ धरणापासून साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रादरम्यानची साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलली जाणार आहे. सध्याची वाहिनी खराब झाल्याने पाणी गळतीचे, जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण अधिक आहे. ही समस्या नवीन जलवाहिनीमुळे सुटेल व पाण्याची गळती थांबून रत्नागिरीकरांना पुरेसे पाणी मिळेल. रत्नागिरीतील साठवण टाक्या, शहरातील पाणी वितरण जलवाहिन्यांचे खराब झालेले जाळे बदलणे, नाचणे व साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रांचे आधुनिकीकरण करणे, पानवल धरणाची नव्याने उभारणी, पानवल धरणापासून नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंतची जलवाहिनी बदलणे, पाणीपुरवठ्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणे, यासारखी कामे या सुधारित नळपाणी योजनेत प्राधान्याने होणार आहेत. (प्रतिनिधी)वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेणारटोर्इंग केलेल्या वाहनांसाठीची जागा नगर परिषदेची आहे. या जागेच्या प्रवेशद्वाराला नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार कुलुप लावण्यात आले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर ही जागा टोर्इंग केलेली वाहने ठेवण्यासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शहरातील वाहनधारक, व्यापारी, फेरीवाले तसेच अन्य घटकांच्याही काही समस्या आहेत. त्यामुळे लवकरच वाहतुकीबाबत सर्वसमावेशक बैठक घेऊ.