शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचा मार्ग सोपा अन् कठीणही

By admin | Updated: June 10, 2016 00:16 IST

आवडीला मुरड? : वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न महाविद्यालयांकडे ओढा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून २७ हजार ५३९ विद्यार्थी बसले होते, पैकी २६ हजार ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १४० महाविद्यालयांतून २६ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा ४८९ इतक्या जागा जास्त आहेत. परंतु आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांना थोडे अवघड, थोडे कठीण झाले आहे.जिल्ह्यातील १४० कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेमध्ये विद्यार्थीसंख्या ७६००, वाणिज्य शाखेत ७४४०, विज्ञान शाखेत ८८४०, तर संयुक्त शाखेच्या ३४८० इतक्या जागा मिळून अकरावी प्रवेशासाठी २६ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश जेवढा सोपा तेवढाच अवघड झाला आहे.दहावी, बारावी निकालामध्ये कोकण मंडळ सतत अग्रक्रमी राहिले आहे. दरवर्षी प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अधिक असताना एकही विद्यार्थी प्रवेशापासून अद्याप वंचित राहिलेला नाही. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा ४८९ इतक्या जागा जास्त असल्याने त्या रिक्त राहणार आहेत. अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करतात, दहावीनंतर इंजिनिअर, डिप्लोमाकडे वळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही विद्यार्थी मुंबई, पुणे तसेच अन्य शहरातील महाविद्यालयाकडे जातात. ग्रामीण भागात शाळेशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयापेक्षा शहरातील महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी गर्दी करतात. विज्ञान, वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करतात. आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पालक, विद्यार्थ्यांचा आग्रह असल्यामुळेच प्रवेश प्रक्रिया जटील बनते. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जात असला तरी काही प्रवेश राखीव ठेवले जातात. संस्था चालकांच्या संमत्तीने प्रवेश मिळविले जातात. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशीबरोबर पैसेही मोजले जातात.वास्तविक प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या अल्प आहे. परंतु पालक आपल्या इच्छेनुसार प्रवेश घेतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अभ्यासात कमी पडताना दिसतात. अखेर वर्ष पैसे, श्रम वाया जातात. त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्या शाखेत प्रवेश घेतला तर नक्कीच योग्य होईल. सध्या डाएटतर्फे विद्यार्थी कलचाचणी सुरू आहे. या चाचणीव्दारे विद्यार्थ्यांना कोणत्या शाखेची आवड आहे, हे स्पष्ट होणार आहे. विनाकारण प्रतिष्ठेसाठी एखाद्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी आवडीच्या शाखेत घेऊन तसेच येणे - जाणे सोपे होईल, अशाच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)