शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

हाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:01 IST

art, ratnagirinews ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

ठळक मुद्देहाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळेराहुल कळंबटेंकडून शहिदांना आदरांजली

अरुण आडिवरेकररत्नागिरी : ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.रत्नागिरी येथील कुणबी भवन येथे वर्धापन दिनानिमित्त राहुल कळंबटे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. गेली ११ वर्ष राहुल कळंबटे विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटत आहेत. त्यात ८ वर्ष संस्कार भारती तर ३ वर्ष पोट्रेट रांगोळ्या साकारत आहेत. ज्वलंत विषयावर रांगोळी रेखाटण्याचा त्यांना जणू छंदच लागला आहे.कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, कुटुंबातील तरणाताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे.

तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचे वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतातच. पण तरीही शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल, असा हृदयस्पर्शी प्रसंग रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आपल्या रांगोळीच्या अदाकारीतून हुबेहूब रेखाटला आहे.ही रांगोळी पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशांत राजिवले आणि राजीव भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कळंबटे यांनी रांगोळी रेखाटण्याची कला अवगत केली आहे. शनिवारी राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या या रांगोळीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. 

चालू घडामोडींवर रांगोळी रेखाटायला अधिक आवडते. दोनच दिवसांपूर्वी सीमेवर लढणारे लढणारे जवान शहीद झाले. शहिदांप्रति असणारा आदर, त्यांच्याप्रति असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटताना त्या मातेच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मनही दाटून येत होते. या रांगोळीच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.- राहुल कळंबटे

टॅग्स :artकलाRatnagiriरत्नागिरी