शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:01 IST

art, ratnagirinews ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

ठळक मुद्देहाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळेराहुल कळंबटेंकडून शहिदांना आदरांजली

अरुण आडिवरेकररत्नागिरी : ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.रत्नागिरी येथील कुणबी भवन येथे वर्धापन दिनानिमित्त राहुल कळंबटे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. गेली ११ वर्ष राहुल कळंबटे विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटत आहेत. त्यात ८ वर्ष संस्कार भारती तर ३ वर्ष पोट्रेट रांगोळ्या साकारत आहेत. ज्वलंत विषयावर रांगोळी रेखाटण्याचा त्यांना जणू छंदच लागला आहे.कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, कुटुंबातील तरणाताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे.

तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचे वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतातच. पण तरीही शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल, असा हृदयस्पर्शी प्रसंग रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आपल्या रांगोळीच्या अदाकारीतून हुबेहूब रेखाटला आहे.ही रांगोळी पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशांत राजिवले आणि राजीव भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कळंबटे यांनी रांगोळी रेखाटण्याची कला अवगत केली आहे. शनिवारी राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या या रांगोळीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. 

चालू घडामोडींवर रांगोळी रेखाटायला अधिक आवडते. दोनच दिवसांपूर्वी सीमेवर लढणारे लढणारे जवान शहीद झाले. शहिदांप्रति असणारा आदर, त्यांच्याप्रति असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटताना त्या मातेच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मनही दाटून येत होते. या रांगोळीच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.- राहुल कळंबटे

टॅग्स :artकलाRatnagiriरत्नागिरी