शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:01 IST

art, ratnagirinews ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

ठळक मुद्देहाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळेराहुल कळंबटेंकडून शहिदांना आदरांजली

अरुण आडिवरेकररत्नागिरी : ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.रत्नागिरी येथील कुणबी भवन येथे वर्धापन दिनानिमित्त राहुल कळंबटे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. गेली ११ वर्ष राहुल कळंबटे विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटत आहेत. त्यात ८ वर्ष संस्कार भारती तर ३ वर्ष पोट्रेट रांगोळ्या साकारत आहेत. ज्वलंत विषयावर रांगोळी रेखाटण्याचा त्यांना जणू छंदच लागला आहे.कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, कुटुंबातील तरणाताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे.

तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचे वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतातच. पण तरीही शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल, असा हृदयस्पर्शी प्रसंग रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आपल्या रांगोळीच्या अदाकारीतून हुबेहूब रेखाटला आहे.ही रांगोळी पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशांत राजिवले आणि राजीव भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कळंबटे यांनी रांगोळी रेखाटण्याची कला अवगत केली आहे. शनिवारी राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या या रांगोळीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला. 

चालू घडामोडींवर रांगोळी रेखाटायला अधिक आवडते. दोनच दिवसांपूर्वी सीमेवर लढणारे लढणारे जवान शहीद झाले. शहिदांप्रति असणारा आदर, त्यांच्याप्रति असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटताना त्या मातेच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मनही दाटून येत होते. या रांगोळीच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.- राहुल कळंबटे

टॅग्स :artकलाRatnagiriरत्नागिरी