शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धनगर वस्तीत खासगी टँकरने पाणीपुरवठा-

By admin | Updated: March 30, 2016 00:02 IST

-लोकमतचा प्रभाव

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील अडरे, अनारी, कोंडमळा आणि सावर्डे या धनगरवाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, होत असलेले स्थलांतर आणि पाणीटंचाईची दाहकता याबाबतचे अचूक चित्रण ‘लोकमत’ने वृत्तातून केले होते. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या पूजा निकम यांच्या विनंतीला मान देत चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील यानी धनगरवाड्यावर जाऊन पाणीटंचाईची पाहणी केली. निकम यांनी धनगर बांधवांना पाण्याचा पहिला टँकर दिला. धनगरवाड्यांत पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पूजा निकम यांनी सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, शौकत माखजनकर, कोंडमळा उपसरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषद सदस्य रसिका म्हादे यांच्यासह धनगरवाड्यांनी कोंडमळा निवाचीवाडी माळावर थाटलेल्या छावणीवर जाऊन त्यांची विचारपूस केली. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी त्यावेळी धनगर बांधवानी केली होती. धनगर बांधवांना शासनाचा टँकर येत नाहीत, तोपर्यंत आपण स्वत:च्या पैशांतून पाणी देऊ, असे निकम यांनी आश्वासन दिले. पाण्याची दाहकता लक्षात घेऊन तहसीलदार वृषाली पाटील यांनी धनगरवाड्यांची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: येऊ, असे निकम यांना सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये धनगरवाड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वाड्यांची पाहणी केली.यंदा पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवला जाईल. मात्र, पुढील वर्षी आपण वाड्यावर व रस्त्यावर असणारे विहिरींचे रुंदीकरण व खोदाई करून बांधकाम करण्याचा तसेच प्रत्येक वाडीला शेततळे देण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी कोंडिबा बावदाने, चंद्रकांत खरात, शंकर खरात, रामचंद्र गोरे, शांताराम बावदाने, बबन खरात, रायबा खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)कर्तव्य दक्ष तहसीलदारधनगर बांधवांच्या पाणीटंचाईचा जटील प्रश्न लक्षात घेता पाण्याची दाहकता आणि धनगर बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष धनगरवाड्यांवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. अतिदुर्गम भागात येऊन वृषाली पाटील यांनी केलेल्या या दौऱ्यामुळे चिपळूण तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी सापडल्याची प्रतिक्रिया यावेळी धनगर बांधवांनी व्यक्त केली. धनगरबांधवांचे चेहरे खुललेपाण्यासाठी वणवण करणाऱ्या धनगरवाडीवर पूजा निकम यांनी टँकर देताच त्यांचे चेहरे खुलले. सावर्डे ग्रामपंचायत व कोंडमळा ग्रामपंचायतीच्यावतीनेही पाण्याचे टँकर दिले जातील, असे दोन्ही ग्रामपंचायतींनी आश्वासन दिले आहे.