शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

धनगर वस्तीत खासगी टँकरने पाणीपुरवठा-

By admin | Updated: March 30, 2016 00:02 IST

-लोकमतचा प्रभाव

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील अडरे, अनारी, कोंडमळा आणि सावर्डे या धनगरवाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, होत असलेले स्थलांतर आणि पाणीटंचाईची दाहकता याबाबतचे अचूक चित्रण ‘लोकमत’ने वृत्तातून केले होते. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या पूजा निकम यांच्या विनंतीला मान देत चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील यानी धनगरवाड्यावर जाऊन पाणीटंचाईची पाहणी केली. निकम यांनी धनगर बांधवांना पाण्याचा पहिला टँकर दिला. धनगरवाड्यांत पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पूजा निकम यांनी सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, शौकत माखजनकर, कोंडमळा उपसरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषद सदस्य रसिका म्हादे यांच्यासह धनगरवाड्यांनी कोंडमळा निवाचीवाडी माळावर थाटलेल्या छावणीवर जाऊन त्यांची विचारपूस केली. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी त्यावेळी धनगर बांधवानी केली होती. धनगर बांधवांना शासनाचा टँकर येत नाहीत, तोपर्यंत आपण स्वत:च्या पैशांतून पाणी देऊ, असे निकम यांनी आश्वासन दिले. पाण्याची दाहकता लक्षात घेऊन तहसीलदार वृषाली पाटील यांनी धनगरवाड्यांची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: येऊ, असे निकम यांना सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये धनगरवाड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वाड्यांची पाहणी केली.यंदा पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवला जाईल. मात्र, पुढील वर्षी आपण वाड्यावर व रस्त्यावर असणारे विहिरींचे रुंदीकरण व खोदाई करून बांधकाम करण्याचा तसेच प्रत्येक वाडीला शेततळे देण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी कोंडिबा बावदाने, चंद्रकांत खरात, शंकर खरात, रामचंद्र गोरे, शांताराम बावदाने, बबन खरात, रायबा खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)कर्तव्य दक्ष तहसीलदारधनगर बांधवांच्या पाणीटंचाईचा जटील प्रश्न लक्षात घेता पाण्याची दाहकता आणि धनगर बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष धनगरवाड्यांवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. अतिदुर्गम भागात येऊन वृषाली पाटील यांनी केलेल्या या दौऱ्यामुळे चिपळूण तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी सापडल्याची प्रतिक्रिया यावेळी धनगर बांधवांनी व्यक्त केली. धनगरबांधवांचे चेहरे खुललेपाण्यासाठी वणवण करणाऱ्या धनगरवाडीवर पूजा निकम यांनी टँकर देताच त्यांचे चेहरे खुलले. सावर्डे ग्रामपंचायत व कोंडमळा ग्रामपंचायतीच्यावतीनेही पाण्याचे टँकर दिले जातील, असे दोन्ही ग्रामपंचायतींनी आश्वासन दिले आहे.