शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

धनगर वस्तीत खासगी टँकरने पाणीपुरवठा-

By admin | Updated: March 30, 2016 00:02 IST

-लोकमतचा प्रभाव

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील अडरे, अनारी, कोंडमळा आणि सावर्डे या धनगरवाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत असून, होत असलेले स्थलांतर आणि पाणीटंचाईची दाहकता याबाबतचे अचूक चित्रण ‘लोकमत’ने वृत्तातून केले होते. त्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या पूजा निकम यांच्या विनंतीला मान देत चिपळूण तहसीलदार वृषाली पाटील यानी धनगरवाड्यावर जाऊन पाणीटंचाईची पाहणी केली. निकम यांनी धनगर बांधवांना पाण्याचा पहिला टँकर दिला. धनगरवाड्यांत पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पूजा निकम यांनी सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, शौकत माखजनकर, कोंडमळा उपसरपंच रमेश म्हादे, जिल्हा परिषद सदस्य रसिका म्हादे यांच्यासह धनगरवाड्यांनी कोंडमळा निवाचीवाडी माळावर थाटलेल्या छावणीवर जाऊन त्यांची विचारपूस केली. आम्हाला पाणी द्या, अशी मागणी त्यावेळी धनगर बांधवानी केली होती. धनगर बांधवांना शासनाचा टँकर येत नाहीत, तोपर्यंत आपण स्वत:च्या पैशांतून पाणी देऊ, असे निकम यांनी आश्वासन दिले. पाण्याची दाहकता लक्षात घेऊन तहसीलदार वृषाली पाटील यांनी धनगरवाड्यांची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: येऊ, असे निकम यांना सांगितले होते. त्यानुसार तहसीलदार पाटील यांनी सावर्डे ग्रामपंचायतीमध्ये धनगरवाड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व वाड्यांची पाहणी केली.यंदा पाण्याचा प्रश्न टँकरने सोडवला जाईल. मात्र, पुढील वर्षी आपण वाड्यावर व रस्त्यावर असणारे विहिरींचे रुंदीकरण व खोदाई करून बांधकाम करण्याचा तसेच प्रत्येक वाडीला शेततळे देण्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवू, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी कोंडिबा बावदाने, चंद्रकांत खरात, शंकर खरात, रामचंद्र गोरे, शांताराम बावदाने, बबन खरात, रायबा खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)कर्तव्य दक्ष तहसीलदारधनगर बांधवांच्या पाणीटंचाईचा जटील प्रश्न लक्षात घेता पाण्याची दाहकता आणि धनगर बांधवांची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष धनगरवाड्यांवर जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. अतिदुर्गम भागात येऊन वृषाली पाटील यांनी केलेल्या या दौऱ्यामुळे चिपळूण तालुक्याला कर्तव्यदक्ष अधिकारी सापडल्याची प्रतिक्रिया यावेळी धनगर बांधवांनी व्यक्त केली. धनगरबांधवांचे चेहरे खुललेपाण्यासाठी वणवण करणाऱ्या धनगरवाडीवर पूजा निकम यांनी टँकर देताच त्यांचे चेहरे खुलले. सावर्डे ग्रामपंचायत व कोंडमळा ग्रामपंचायतीच्यावतीनेही पाण्याचे टँकर दिले जातील, असे दोन्ही ग्रामपंचायतींनी आश्वासन दिले आहे.