शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील पाणीपुरवठा सुरळीत : नगराध्यक्ष साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये ...

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असला तरी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

शीळ धरण येथे दोन पंप बसविण्यात आले असून, २४ तास पंप चालवूनदेखील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लोव्ह होत नव्हत्या. मात्र, नवीन पंपामुळे टाक्या काही तासांतच भरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, त्यानंतर शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. डीएसपी लाईनजवळील टाकी सुरू करून चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय, शहरातील जुन्या टाक्या स्वच्छ करून नादुरुस्त झालेल्या भागाची दुरुस्ती व रंगकाम केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. वडापाव विक्रेत्यांनाही पार्सल विक्रीबाबतची सूचना करण्यात आली आहे. पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी नगर परिषदेच्या भरणा केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मारूती मंदिर येथेही वसुली केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी स्वतंत्र दोन बाॅक्स तयार करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये अर्ज टाकायचे आहेत. दाखल्यांबाबतच्या सूचना नागरिकांना फोनवर देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी ते घेऊन जावेत. नगर परिषदेमध्ये अभ्यागतांसाठी सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक वही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे निवारण तत्काळ केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील रस्ता दुरस्ती व डांबरीकरणाचे काम १५ एप्रिलनंतर सुरू केले जाणार आहे.

यावेळी मुख्याध्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते.