शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाणीटंचाई कृती आराखड्यास विलंब

By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST

जिल्हा परिषद : तालुकास्तरावरील आराखडे देण्यात होतेय चालढकल

रत्नागिरी : जिल्हा परिषद संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही. तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आल्याने कृती आराखडा तयार करण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला विलंब होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही दरवर्षी ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नदी, नाल्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे जनतेला शासनाकडून टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. गतवर्षी जून महिन्यात १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावली होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तोही दोन-तीन दिवसांनी एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला पायपीट करावी लागली होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावणार असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी डिसेंबरपूर्वी टंचाई कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. मात्र, तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यांना कृती आराखडा सादर करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेतही चर्चा झाली. सभेत टंचाई आराखडा अद्याप तयार का करण्यात आला नाही, आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजूरीसाठी कधी पाठविणार, असे प्रश्न पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये तालुकास्तरावरुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला टंचाई कृती आराखडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी तालुक्यातून अद्याप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आराखडे सादर करण्यात आलेले नाहीत. हे आराखडे येण्यास उशीर झाल्याने जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची धावपळ उडणार आहे. (शहर वार्ताहर)तालुक्याच्या बैठकाच नाहीत...जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येतो. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा पंचायत समितीकडून मागविण्यात येतो. या आराखड्यासाठी तालुक्यामध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. काही तालुक्यांमध्ये कृती आराखड्याबाबत अजूनही बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कसा पाठविणार, असा प्रश्न पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.