शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई कृती आराखड्यास विलंब

By admin | Updated: December 14, 2014 23:52 IST

जिल्हा परिषद : तालुकास्तरावरील आराखडे देण्यात होतेय चालढकल

रत्नागिरी : जिल्हा परिषद संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा अद्याप तयार झालेला नाही. तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात आल्याने कृती आराखडा तयार करण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला विलंब होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही दरवर्षी ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची असल्याने जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे पावसाचे पाणी नदी, नाल्यांच्या वाटे समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे जनतेला शासनाकडून टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. गतवर्षी जून महिन्यात १२२ गावांतील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई भेडसावली होती. या टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. तोही दोन-तीन दिवसांनी एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पाण्यासाठी जनतेला पायपीट करावी लागली होती.दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पाणीटंचाई भेडसावणार असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी डिसेंबरपूर्वी टंचाई कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या होत्या. मात्र, तालुकास्तरावरुन हे आराखडे देण्यास चालढकल करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून तालुक्यांना कृती आराखडा सादर करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या सभेतही चर्चा झाली. सभेत टंचाई आराखडा अद्याप तयार का करण्यात आला नाही, आराखडा जिल्हा प्रशासनाकडे मंजूरीसाठी कधी पाठविणार, असे प्रश्न पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये तालुकास्तरावरुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला टंचाई कृती आराखडे सादर करणे आवश्यक होते. मात्र, डिसेंबरचा पंधरवडा संपला तरी तालुक्यातून अद्याप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे आराखडे सादर करण्यात आलेले नाहीत. हे आराखडे येण्यास उशीर झाल्याने जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची धावपळ उडणार आहे. (शहर वार्ताहर)तालुक्याच्या बैठकाच नाहीत...जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावते. त्यासाठी टंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येतो. हा आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्याचा टंचाई कृती आराखडा पंचायत समितीकडून मागविण्यात येतो. या आराखड्यासाठी तालुक्यामध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येते. काही तालुक्यांमध्ये कृती आराखड्याबाबत अजूनही बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कसा पाठविणार, असा प्रश्न पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.