शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

सामंजस्यातून झाली पाणीयोजना सुरु

By admin | Updated: April 15, 2015 23:58 IST

संगमेश्वर तालुका : रांगव-शेजवडेच्या ग्रामस्थांनी काढला एकमताने तोडगा--लोकमतचा प्रभाव

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीने ६५ लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवली. मात्र, येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या विहिरीचे पैसे अदा न झाल्याने ती चालू होऊ शकली नव्हती. ही बाब दोन्हीकडच्या ग्रामस्थांनी सामंजस्याने तोडगा काढून सोडवली आहे. त्यामुळे आता दोन्ही गावांना नळपाणी योजनेचे पाणी उपलब्ध होणार आहे.रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीवर गेली दोन वर्षे प्रशासक नियुक्त आहे. प्रशासनाला अपुऱ्या असलेल्या माहितीमुळे व येथील ग्रामपंचायत सदस्यांमुळे या ठिकाणी सरपंच नियुक्त होऊ शकला नाही. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ६५ लाख रुपये निधी खर्ची टाकून येथे पाणीयोजना राबवण्यात आली. या योजनेचे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेची पाईपलाईन जमिनीवरुनच काढली असल्याने वणव्यामुळे ती जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ही योजना ज्या विहिरीवर राबवण्यात आली आहे ती विहीर रांगव मधलीवाडी, कुुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधली आहे. टंचाईग्रस्त कार्यक्रमांतर्गत या विहिरीवर २ लाख ९४ हजार रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. मात्र, विहिरीचे काम करणाऱ्या ग्रामस्थांना यातील एकही रुपया मिळाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.रांगव ग्रामस्थांनी ही योजना चालू करण्यास याच कारणाने विरोध केला होता. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावातील ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. हा गुंता आता सुटला असून, संबंधित ग्रामस्थांना काही रक्कम देऊन ही योजना चालू करण्यात आली आहे. (वार्ताहर)रांगव - शेजवडे या दोन गावातील हा तिढा सुटता सुटत नव्हता. अखेरीस दोन्ही गावातील काही ग्रामस्थांनी ही बाब ‘लोकमत’चे मिलिंद चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होणार, अशी माहिती मिळताच दोन्ही गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी लोकमतशी संपर्क साधून सामंजस्याने तोडगा काढण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे; यासाठी चव्हाण यांनी मध्यस्थी केली. अखेरीस या नळपाणी योजनेबाबतचा वाद मिटला आहे.