शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

सामंजस्यातून झाली पाणीयोजना सुरु

By admin | Updated: April 15, 2015 23:58 IST

संगमेश्वर तालुका : रांगव-शेजवडेच्या ग्रामस्थांनी काढला एकमताने तोडगा--लोकमतचा प्रभाव

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीने ६५ लाख रुपये खर्च करुन नळपाणी योजना राबवली. मात्र, येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेल्या विहिरीचे पैसे अदा न झाल्याने ती चालू होऊ शकली नव्हती. ही बाब दोन्हीकडच्या ग्रामस्थांनी सामंजस्याने तोडगा काढून सोडवली आहे. त्यामुळे आता दोन्ही गावांना नळपाणी योजनेचे पाणी उपलब्ध होणार आहे.रांगव - शेजवडे ग्रामपंचायतीवर गेली दोन वर्षे प्रशासक नियुक्त आहे. प्रशासनाला अपुऱ्या असलेल्या माहितीमुळे व येथील ग्रामपंचायत सदस्यांमुळे या ठिकाणी सरपंच नियुक्त होऊ शकला नाही. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत ६५ लाख रुपये निधी खर्ची टाकून येथे पाणीयोजना राबवण्यात आली. या योजनेचे काम निकृ ष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेची पाईपलाईन जमिनीवरुनच काढली असल्याने वणव्यामुळे ती जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ही योजना ज्या विहिरीवर राबवण्यात आली आहे ती विहीर रांगव मधलीवाडी, कुुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधली आहे. टंचाईग्रस्त कार्यक्रमांतर्गत या विहिरीवर २ लाख ९४ हजार रुपये खर्ची टाकण्यात आले आहेत. मात्र, विहिरीचे काम करणाऱ्या ग्रामस्थांना यातील एकही रुपया मिळाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.रांगव ग्रामस्थांनी ही योजना चालू करण्यास याच कारणाने विरोध केला होता. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावातील ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती. हा गुंता आता सुटला असून, संबंधित ग्रामस्थांना काही रक्कम देऊन ही योजना चालू करण्यात आली आहे. (वार्ताहर)रांगव - शेजवडे या दोन गावातील हा तिढा सुटता सुटत नव्हता. अखेरीस दोन्ही गावातील काही ग्रामस्थांनी ही बाब ‘लोकमत’चे मिलिंद चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबतचे वृत्त प्रकाशित होणार, अशी माहिती मिळताच दोन्ही गावांतील ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी लोकमतशी संपर्क साधून सामंजस्याने तोडगा काढण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे; यासाठी चव्हाण यांनी मध्यस्थी केली. अखेरीस या नळपाणी योजनेबाबतचा वाद मिटला आहे.