शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

राजापुरातील ८४ गावांच्या पाणीटंचाईसाठी केवळ सव्वा काेटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला ...

राजापूर : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ८४ गावांतील २४४ वाड्यांचा सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून केवळ सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून काही ठरावीक गावांमधील पाणीपुरवठ्याची कामे होणार असून, उर्वरित गावांची तहान कशी भागविणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या आराखड्यामध्ये त्या-त्या गावात पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाय-योजना सुचविण्यात येतात. राजापूर पंचायत समितीतर्फे यावर्षी तालुक्यातील ८४ गावातील २४४ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश करून या गाव-वाड्यांमध्ये टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चाचा जंबो आराखडा तयार केला होता. या टंचाई आराखड्यामध्ये वडवली, शिवणे बु., धोपेश्वर, देवाचेगोठणे, नाटे, शिवणे खुर्द, मोगरे, गोवळ, तेरवण, भू, कशेळी, तुळसवडे, वाटूळ, कोंडीवळे, येरडव, काजिर्डा, करक, ताम्हाणे, कोंढेतड, ओझर, रायपाटण, ओशिवळे, कोळवणखडी, वाटूळ, परटवली, परूळे, मूर, झर्ये, मिळंद, सावडाव, पाचल, मिठगवाणे, साखरीनाटे, साखर, कारवली, मोसम, डोंगर, गोठणेदोनिवडे, हरळ, पुंभवडे, हसोळतर्फ सौंदळ, सोल्ये, जवळेथर, केळवली, कोदवली, मोरोशी, शिळ, ओणी, गोवळ, उन्हाळे, पेंडखळे, तळगाव, कोंडये, दोनिवडे, पडवे, दळे, मठखुर्द, आंगले, मोसम, आडवली, वडदहसोळ, येळवण, हातदे, कुवेशी, आजिवली, खरवते, सौंदळ, जैतापूर, धाऊलवल्ली, सागवे, महाळुंगे, भालावली, जुवाठी, जुवेजैतापूर, तळवडे, तारळ, चौके, कळसवळी, वाडापेठ, राजवाडी, विलये, नाणार, अणसुरे व चिखलगाव या गावांचा समावेश आहे.

या गावांमधील पाणीटंचाई दूर होण्यासाठी विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजना दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती, नळपाणी योजना नवीन करणे, सार्वजनिक विहिरी खोदणे, दुरुस्ती करणे, साठवण टाकी बांधणे, दुरुस्ती करणे, बंधारे बांधणे, गाळ उपसणे, तसेच आवश्यकता भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करणे अशी ढीगभर कामे सुचविण्यात आली होती. राजापूर पंचायत समितीने सुचविलेल्या या ढीगभर कामांसाठी जिल्हा परिषदेने केवळ मूठभर निधी मंजूर केल्याने हा आराखडा केवळ दिखावा ठरला आहे. पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या १९ कोटी ४६ लाख रुपयांच्या टंचाई आराखड्यापोटी जिल्हा परिषदेकडून केवळ १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २४४ वाड्यांपैकी काही ठरावीक वाड्यांमध्येच पाणीपुरवठ्याची कामे होणार आहे.