शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

‘आरजीपीपीएल’मुळे पाणी प्रदूषित, पाणीपुरवठ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

गुहागर : आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी प्रदूषित झाले असल्याने येथील प्रदूषणग्रस्त भागाला कंपनीने तातडीने पाणीपुरवठा ...

गुहागर : आरजीपीपीएल कंपनीमुळे अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी प्रदूषित झाले असल्याने येथील प्रदूषणग्रस्त भागाला कंपनीने तातडीने पाणीपुरवठा करावा आणि प्रदूषित घरांना कंपनीने स्वखर्चाने विहीर किंवा बोअरवेलद्वारे पाईपलाईनने प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पत्राद्वारे कंपनी प्रशासनाकडे केली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी पिण्यास अयोग्य आणि पूर्ण प्रदूषित झाले असून, यामध्ये क्षारयुक्त असे अनावश्यक घटक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण, फूड हायजिन आणि हेल्थ लॅबोरेटरी पुणे या संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हे प्रदूषित पाणी वापरल्यास येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. आरजीपीपीएल कंपनीच्या प्रदूषित पाण्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून येथील नैसर्गिक स्रोत दूषित झाल्याची तक्रार २९ मार्च रोजी पत्राद्वारे प्रशासनाला केली होती. गेला महिनाभर कंपनी प्रशासनाने पाणी नमुने गोळा करण्याव्यतिरिक्त अन्य कोणतीही ठोस कारवाई केली नाही. ग्रामस्थांच्या पत्राला उत्तरही दिले नाही. ग्रामस्थांनी मागूनही पाणी नमुने अहवाल दिले नाहीत. अखेर ग्रामस्थांनी येथील पाणी नमुने दिल्यानंतर हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अशाच प्रकारचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळालाही आला आहे. प्रदूषण आमच्यामुळे झालेच नाही असा कंपनी प्रशासनाचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालामुळे खोटा असल्याचे आता पुढे आले आहे.