शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आवरायलाच हवं!

By admin | Updated: July 23, 2016 00:06 IST

मग अशी प्रकरणे बलात्कार म्हणून दाखल होतात. ही बाब चिंताजनक नाही?

बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडच्या काळात बरीच वाढ झाली आहे. या विषयातले राजकारण बाजूला ठेवून त्यावर विचार करायला हवा, असा मुद्दाच कोणी पुढे आणताना दिसत नाहीत. ज्यात-त्यात राजकारणच (आणि अलिकडे पुन्हा वाढलेला जातीयवाद) आणण्यात अनेकांना रस असतो. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली शरीरसंबंध ठेवतात आणि मग अशी प्रकरणे बलात्कार म्हणून दाखल होतात. ही बाब चिंताजनक नाही? वेळीच सावरायला आणि त्याहीपेक्षा आवरायला हवे. संस्कारांची धार कमी पडत चालली आहे का?१९ वर्षाच्या मुलाने १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी वाचताना थरथरायलाच होते. वर्षभर प्रेमप्रकरण सुरू होते. मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी संबंधित मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एक संवेदनशील शिक्षिका सांगत होत्या, आठवी-नववीतल्या मुलींकडे प्रेमपत्र सापडतात. त्यातील भाषाही गचाळ असते. आठवी-नववीपासूनच शारीरिक संबंधांबाबत पूर्ण माहिती असते आणि काहीजण अनुभवही घेतात. त्या शिक्षिकेने असंख्य मुलींचे समुपदेशन करून त्यांना अशा गोष्टी करण्याचे वय अजून यायचं असल्याची जाणीव करून दिली.ही बाब धक्कादायक नाही? यात कुठल्या राजकीय पक्षाचा दोष नाही. यात पोलीस यंत्रणेचा दोष नाही. चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, खून यात वाढ झाली तर पोलीस यंत्रणेला दोष देता येईल. पण शाळकरी मुलांमध्ये असे प्रकार घडतात, याचा दोष पोलीस यंत्रणेचा कसा काय असेल? हा दोष समाजाचाच आहे. अशा गोष्टी रोखायला समाज व्यवस्थाच कारणीभूत आहे. पालकांचा मुलांशी कमी होणारा संवाद हेही त्याचे प्रमुख कारण आहे. ज्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करतात, त्या मुलांच्या वर्तनाकडे, त्या मुलांच्या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही.खेड तालुक्यात १५ दिवसात शाळकरी मुलांशी संबंधित काही घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे आपण कुठे चाललोय हेच समजत नाही. काही प्रकार खरोखरच निंदनीय आहेत. विद्यार्थिनींशी लिपिकाचे किंवा शिक्षकाचे गैरवर्तन ही बाब गैरच आहे. अशा प्रवृत्ती वेळीच शोधून ठेचूनच काढायला हव्यात. पण शाळकरी मुला-मुलींचे प्रेमप्रकरण आणि शारीरिक संबंध या गोष्टी मात्र धक्कादायक आहेत.अशी परिस्थिती निर्माण व्हायला कुठला एकच विशिष्ट घटक कारणीभूत आहे, असे नाही. अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्या साऱ्या एकत्रित होऊनच समाज व्यवस्था बनते. थोडक्यात ही व्यवस्थाच अस्थिर झाली आहे. चंगळवादी झाली आहे. भविष्याचा विचार करताना फक्त भविष्यकाळासाठीच्या आर्थिक तरतुदीचा विचार केला जातो. संस्कार हा भाग त्यात दुर्लक्षिलाच गेला आहे. माझा मुलगा संस्कारक्षम माणूस व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी माझ्या मुलाला डॉक्टर करायचंय, परदेशात पाठवायचंय म्हणून आर्थिक तरतूद केली जाते. पालक आणि मुलांमधले कमी होणारे संवाद हा त्यातील एक प्रभावी घटक आहे.एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा सुरू होती. पालक काय आपल्या मुलाला बलात्कार करायला शिकवतात काय, असा मुद्दा एकाने हिरीरीने मांडला. पालक मुलांना बलात्कार करायला शिकवत नाहीत, हे खरं आहे. पण मुलीकडे माणूस म्हणून बघ, तिच्याकडे वस्तू म्हणून बघू नको, हा संस्कार पालकांनीच द्यायचा आहे ना? मुलीने नीट कपडे घालावेत, असे सांगणारे लोक मुलांची नजर सुधारावी, असा मुद्दा का मांडत नाहीत? म्हणजेच मुलांच्या मनातली मुलीची, स्त्रीची प्रतिमा आदराची असावी, यासाठी संस्कारचं हवेत ना? त्यासाठी संवाद हवा.ही सर्व परिस्थिती वेळीच सावरायची असेल तर मुलांच्या मानसिकतेला आवरावं लागेल. त्यासाठी पालकांनी सजग आणि सतर्क व्हावे लागेल. पालकांनी मुलांवर सुसंस्कार करावेत यासाठीचा कायदा नाही. पालकांनी मुलाच्या भवितव्यासाठी पैसा जोडण्याबरोबरच संस्कारही जोडणे गरजेचे बनले आहे. संस्कारांची अधिक गरज मुलींपेक्षा मुलांनाच अधिक आहे. पुढचा समाज सुदृढ होण्यासाठी आताच्या मुलांवर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. आधीच या पिढीसमोरची प्रलोभने खूप आहेत. त्यात त्यांना आवश्यक संस्कार मिळाले नाहीत तर...?मनोज मुळ्ये