शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

गुहागर तालुका : सर्वसामान्यांसाठी आबलोली आरोग्य केंद्राच्या दर्जा वाढीची गरज

आबलोली : गुहागर तालुक्याची वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने होणारा विस्तार यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तालुक्यात असणाऱ्या एकमेव ग्रामीण रुग्णालयावर पडणारा ताण पाहता अन्य एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे गरजेचे बनले आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी यामुळे पुढे येत आहे.कोकणातील सर्वसामान्य जनता आरोग्य सेवेकरिता आजही शासकीय रुग्णालयांवर विसंबून आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषत: गुहागर तालुक्यात (सागरी किनारपट्टीवरील तालुका) अस्तित्त्वात असलेले ग्रामीण रुग्णालय (गुहागर), पाच प्राथमिक आरोग्य केंद्र (कोळवली, आबलोली, हेदवी, तळवली, चिखली) व त्याअंतर्गत येणाऱ्या ३० उपकेंद्रांचा विचार करता आरोग्य व्यवस्थेवर नेहमीच कामाचा ताण येतो. त्यातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त पदांमुळे उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात जास्त प्रमाणात गावे आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेले अल्पभूधारक शेतकरी, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा कामगारवर्ग, मजूर यांसारखी सर्वसामान्य जनता येथे मोठ्या प्रमाणावर आहे. ही जनता आरोग्य सेवेसाठी प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्राकडे येत असते. मात्र, या भागाचा विचार करता हेदवी व कोळवली ही आरोग्य केंद्र वाहतुकीच्या दृष्टीने तेवढी सोयीची नसल्याने बरेचसे रुग्ण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आबलोली येथील आरोग्य केंद्राकडे येतात.सध्या आबलोली येथील आरोग्य केंद्रात दैनंदिन बाह्यरुग्ण सरासरी शंभरपेक्षा जास्त असतात. काहीवेळा ही संख्या दीड-दोनशेपर्यंतसुद्धा जाते. तसेच सर्पदंश, विंचूदंश, अपघात व अत्यावश्यक सेवा आवश्यक असणारे रुग्णसुद्धा याच आरोग्य केंद्रात येतात. सर्व रुग्णांना या केंद्रामार्फत रुग्णसेवा दिली जाते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीसाठी या भागामध्ये ग्रामीण रुग्णालय असणे ही जनतेची खूप वर्षापासूनची मागणी आहे.ग्रामीण रुग्णालयातून दिल्या जाणारे उपचार व आंतररुग्ण सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. एक्स-रे, रक्त, लघवी तपासणीसह अन्य तपासण्या व उपचार यासाठी कामथे, डेरवण किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. या ठिकाणी जाणे हे अत्यंत खर्चिक व रुग्णांना गैरसोयीचे आहे. प्रवास, निवास व इतर खर्च यामुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड बसतो.आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी अत्यंत प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यापूर्वी विद्यमान आमदार व तत्कालीन मंत्री भास्कर जाधव यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी तालुक्यातील गुहागर येथे एक ग्रामीण रुग्णालय असल्याने व नवीन ग्रामीण रुग्णालयाचा अनुशेष शिल्लक नसल्याने आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय करता येणार नसल्याचे शासनाने कळवले होते. यावर विशेष बाब म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यानंतर ही प्रक्रिया थंडावली असून, आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)कार्यवाहीची अपेक्षा : कोकणातीलच नेतेसध्या युतीचे शासन आहे. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच पालकमंत्री रवींद्र वायकर हे दोघेही कोकणातीलच असल्याने त्यांना येथील जनतेच्या समस्यांची जाणीव आहे. त्यादृष्टीने आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांनी आबलोली येथे ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष प्रयत्न करावेत. सामान्य जनतेच्या सोयीसाठी आबलोली येथे ग्रामीण रुग्णालय होण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत आणि त्याची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहेएकच रूग्णालयगुहागर तालुक्यात सद्यस्थितीत एकच ग्रामीण रूग्णालय आहे. तालुक्याचा विचार करता एका रूग्णालयावर खूपच ताण पडत आहे.