शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत या रिक्षा व्यावसायिकांना हा लाभ मिळालेला नाही. अनेकांनी शासनाचे पोर्टलच अद्याप सुरू होत नसल्याची अडचण सांगितली, तर काहींचे परवाने अद्याप ऑनलाईन झाले नसल्याने त्यांना लाभ मिळताना अडचण निर्माण झाली आहे.

लाॅकडाऊन सुरू झाल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या व्यवसायावर गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी पाेर्टल विकसित करून त्याद्वारे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात काही रिक्षा व्यावसायिक परवानाधारक असले तरी, त्यांची नोंदणी ऑनलाईन झाली नसल्याने त्यांची पोर्टलवर नोंद होत नाही. तसेच काहींच्यामते पोर्टलच सुरू नसल्याने अद्याप या मदतीची प्रतीक्षाच आहे.

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना लाॅकडाऊनच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी १५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही या मदतीची प्रतीक्षाच करीत आहोत. शासनाने यासाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, बरेचदा हे पोर्टल सुरूच नसते. तसेच काहींना यावर माहिती भरताही येत नसल्याने अनेकांना मदत मिळताना अडचणी येत असून ते आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

- प्रमोद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना १५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. परंतु अजून तरी हे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. सध्या लाॅकडाऊनमुळे आमचा व्यवसाय थांबला आहे. प्रवासीच नसल्याने व्यवसाय कसा होणार? त्यामुळे शासनाने आम्हाला वेळेवर मदत केली तर सध्या आमची होत असलेली उपासमार टळेल. सध्या आम्ही शासनाच्या मदतीची वाट बघत आहोत.

- प्रशांत मुळ्ये, कोळंबे, ता. संगमेश्वर

काही परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना शासनाची दीड हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, काहींनी परवाने अजूनही ऑनलाईन केलेले नसल्याने परवानाधारक म्हणून त्यांची नोंद झाली नसल्याने अशांंना शासनाची ही मदत मिळताना अडचण येऊ शकते. काही ठिकाणी पोर्टलचीही समस्या येत आहे.

- अविनाश कदम, उपजिल्हा अध्यक्ष, शिवसेना प्रणित रिक्षा व्यावसायिक संघटना, रत्नागिरी

परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या मानधनाचा विषय जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाच्या पोर्टलवर त्यांचे नाव, परवाना क्रमांक, आधार क्रमांक, बॅंक खाते नमूद करावे लागते. त्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.

- दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी