शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत या रिक्षा व्यावसायिकांना हा लाभ मिळालेला नाही. अनेकांनी शासनाचे पोर्टलच अद्याप सुरू होत नसल्याची अडचण सांगितली, तर काहींचे परवाने अद्याप ऑनलाईन झाले नसल्याने त्यांना लाभ मिळताना अडचण निर्माण झाली आहे.

लाॅकडाऊन सुरू झाल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या व्यवसायावर गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी पाेर्टल विकसित करून त्याद्वारे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात काही रिक्षा व्यावसायिक परवानाधारक असले तरी, त्यांची नोंदणी ऑनलाईन झाली नसल्याने त्यांची पोर्टलवर नोंद होत नाही. तसेच काहींच्यामते पोर्टलच सुरू नसल्याने अद्याप या मदतीची प्रतीक्षाच आहे.

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना लाॅकडाऊनच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी १५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही या मदतीची प्रतीक्षाच करीत आहोत. शासनाने यासाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, बरेचदा हे पोर्टल सुरूच नसते. तसेच काहींना यावर माहिती भरताही येत नसल्याने अनेकांना मदत मिळताना अडचणी येत असून ते आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

- प्रमोद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना १५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. परंतु अजून तरी हे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. सध्या लाॅकडाऊनमुळे आमचा व्यवसाय थांबला आहे. प्रवासीच नसल्याने व्यवसाय कसा होणार? त्यामुळे शासनाने आम्हाला वेळेवर मदत केली तर सध्या आमची होत असलेली उपासमार टळेल. सध्या आम्ही शासनाच्या मदतीची वाट बघत आहोत.

- प्रशांत मुळ्ये, कोळंबे, ता. संगमेश्वर

काही परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना शासनाची दीड हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, काहींनी परवाने अजूनही ऑनलाईन केलेले नसल्याने परवानाधारक म्हणून त्यांची नोंद झाली नसल्याने अशांंना शासनाची ही मदत मिळताना अडचण येऊ शकते. काही ठिकाणी पोर्टलचीही समस्या येत आहे.

- अविनाश कदम, उपजिल्हा अध्यक्ष, शिवसेना प्रणित रिक्षा व्यावसायिक संघटना, रत्नागिरी

परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या मानधनाचा विषय जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाच्या पोर्टलवर त्यांचे नाव, परवाना क्रमांक, आधार क्रमांक, बॅंक खाते नमूद करावे लागते. त्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.

- दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी