शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

By admin | Updated: April 25, 2017 22:55 IST

परिवहन महामंडळ : १९ कोटी २३ लाखांचे यंदा कमी उत्पन्न

रत्नागिरी : बंद झालेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या, बेसुमार अवैध वाहतूक व्यवसाय यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. सहन करावा लागत आहे. गतवर्षी हाच तोटा २ कोटी १७ लाख इतका होता. आता तो तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांवर गेला आहे.ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ असे संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने शटल फेऱ्यांची सुविधा सुरू केली आहे. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जाऊन एस. टी. पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एस. टी. धावत असल्यामुळे एस. टी.चे नुकसान होत आहे. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळाला भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यावर्षी महामंडळाने दिवाळीच्या सुटीत काही दिवसांपुरती हंगामी भाडेवाढ केली होती. रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. याशिवाय ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक करण्यात आली. तसेच निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसमारंभ यामुळे एस. टी.ला उत्पन्न प्राप्त होत आहे.अवैध प्रवासी वाहतूक वाढत असतानाच महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागत आहे. शिवाय आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने शटल फेऱ्या सुरु केल्या आहेत. मात्र अजूनही सर्वच भागांमध्ये अवैध वाहतुकीचे प्रमाण खूप मोठे असून, त्यामुळेच एस. टी. महामंडळ सातत्याने तोट्यात जात आहे.सन २०१६ - १७मध्ये रत्नागिरी विभागाला २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दापोली आगाराला ३१ कोटी ३९ लाख ६० हजार, खेड आगारास ३१ कोटी ४६ लाख ६० हजार, चिपळूण आगारास ४४ कोटी २७ लाख ३२ हजार, गुहागर आगारास २६ कोटी २ लाख २४ हजार, देवरुख आगारास २७ कोटी ७३ लाख ४५ हजार, रत्नागिरी आगारास ५३ कोटी ७० लाख ८५ हजार, लांजा आगारास १६ कोटी ४० लाख ४७ हजार, राजापूर आगारास १७ कोटी ४१ हजार ८, मंडणगड आगारास १२ कोटी ८१ लाख ५५ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.गतवर्षी दापोली आगाराला ३४ कोटी ५० लाख ३६ हजार, खेड आगाराला ३३ कोटी ३१ लाख ७४ हजार, चिपळूण आगाराला ४६ लाख ५७ लाख ३५ हजार, गुहागर आगाराला २८ कोटी २७ लाख ५३ हजार, देवरूख आगाराला २९ लाख ५५ हजार, रत्नागिरी आगाराला ५६ कोटी ९२ लाख २६ हजार, लांजा आगाराला १८ कोटी ३५ लाख ८३ हजार, राजापूर आगाराला १९ कोटी ९२ लाख ६८ हजार, मंडणगड आगाराला १३ कोटी ९५ लाख ८० हजाराचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)बारटक्के : लांब पल्ल्याच्या गाड्या बंदरत्नागिरी विभागाला २०१६-१७मध्ये २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त.४गतवर्षी २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न.गतवर्षी विभागाच्या उत्पन्नात २ कोटी १७ लाखांची घट.यावर्षी तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांची घट सोसावी लागतेय.महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागतोय.