शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वडाप तेजीत; एसटीची मंदीघंटा अद्याप कायम

By admin | Updated: April 25, 2017 22:55 IST

परिवहन महामंडळ : १९ कोटी २३ लाखांचे यंदा कमी उत्पन्न

रत्नागिरी : बंद झालेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या, बेसुमार अवैध वाहतूक व्यवसाय यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला २०१६-१७ मध्ये १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. सहन करावा लागत आहे. गतवर्षी हाच तोटा २ कोटी १७ लाख इतका होता. आता तो तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांवर गेला आहे.ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर पोहोचलेल्या एस. टी.ला ‘जीवनवाहिनी’ असे संबोधले जाते. खासगी वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांचा ओढा अधिक आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीशी एस. टी.ला सातत्याने स्पर्धा करावी लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महामंडळाने शटल फेऱ्यांची सुविधा सुरू केली आहे. ग्रामीण भागात वाडीवस्तीवर जाऊन एस. टी. पोहोचली आहे. अनेक वेळा कमी भारमानातही एस. टी. धावत असल्यामुळे एस. टी.चे नुकसान होत आहे. इंधनदरात वर्षभरात सातत्याने वाढ झाली तरी सातत्याने महामंडळाला भाडेवाढ करता येत नाही. त्यामुळे एस. टी.च्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यावर्षी महामंडळाने दिवाळीच्या सुटीत काही दिवसांपुरती हंगामी भाडेवाढ केली होती. रत्नागिरी विभागातर्फे ‘मागेल त्याला गाडी’ अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. याशिवाय ‘प्रवासी वाढवा’ अभियानांतर्गत अधिकाधिक प्रवासी गाडीत घेऊन वाहतूक करण्यात आली. तसेच निवडणुका, यात्रोत्सव, सहली, लग्नसमारंभ यामुळे एस. टी.ला उत्पन्न प्राप्त होत आहे.अवैध प्रवासी वाहतूक वाढत असतानाच महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागत आहे. शिवाय आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने शटल फेऱ्या सुरु केल्या आहेत. मात्र अजूनही सर्वच भागांमध्ये अवैध वाहतुकीचे प्रमाण खूप मोठे असून, त्यामुळेच एस. टी. महामंडळ सातत्याने तोट्यात जात आहे.सन २०१६ - १७मध्ये रत्नागिरी विभागाला २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. दापोली आगाराला ३१ कोटी ३९ लाख ६० हजार, खेड आगारास ३१ कोटी ४६ लाख ६० हजार, चिपळूण आगारास ४४ कोटी २७ लाख ३२ हजार, गुहागर आगारास २६ कोटी २ लाख २४ हजार, देवरुख आगारास २७ कोटी ७३ लाख ४५ हजार, रत्नागिरी आगारास ५३ कोटी ७० लाख ८५ हजार, लांजा आगारास १६ कोटी ४० लाख ४७ हजार, राजापूर आगारास १७ कोटी ४१ हजार ८, मंडणगड आगारास १२ कोटी ८१ लाख ५५ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.गतवर्षी दापोली आगाराला ३४ कोटी ५० लाख ३६ हजार, खेड आगाराला ३३ कोटी ३१ लाख ७४ हजार, चिपळूण आगाराला ४६ लाख ५७ लाख ३५ हजार, गुहागर आगाराला २८ कोटी २७ लाख ५३ हजार, देवरूख आगाराला २९ लाख ५५ हजार, रत्नागिरी आगाराला ५६ कोटी ९२ लाख २६ हजार, लांजा आगाराला १८ कोटी ३५ लाख ८३ हजार, राजापूर आगाराला १९ कोटी ९२ लाख ६८ हजार, मंडणगड आगाराला १३ कोटी ९५ लाख ८० हजाराचे उत्पन्न लाभले होते. गतवर्षीच्या तुलनेत १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)बारटक्के : लांब पल्ल्याच्या गाड्या बंदरत्नागिरी विभागाला २०१६-१७मध्ये २६१ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त.४गतवर्षी २८० कोटी १२ हजारांचे उत्पन्न.गतवर्षी विभागाच्या उत्पन्नात २ कोटी १७ लाखांची घट.यावर्षी तब्बल १९ कोटी २३ लाख १६ हजार रुपयांची घट सोसावी लागतेय.महामंडळालादेखील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करावा लागतोय.