शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

विठुरायाला ओढ असते हिशामुद्दीन बाबांच्या दर्ग्याची

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

शेकडो वर्षांची परंपरा : एकात्मतेचे दर्शन देव घडवतात अन् आपण...?

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरीदेशात जाती-धर्मावरून वारंवार वाद उत्पन्न होतात. दंगे-धोपे होतात. देवाच्या ठिकाणी एकजण उच्च, तर दुसरा नीच असा भेदाभेद होतो. प्राचीन काळापासून चालत आलेले हे वाद विज्ञानयुगातही तसेच सुरु आहेत. पण, देवाच्या दरबारी असा भेदाभेद नाही. कारण रत्नागिरीचं दैवत असलेल्या विठुरायालाही हिशामुद्दीन दर्ग्याची ओढ लागलेलीच असते. देवाच्या ठायीही एकात्मता आहे, देवानेही ‘सारी मानवजात एकच’, असाच संदेश दिला आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो वर्षांपासून श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येत आहे. कार्तिकोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता श्री विठ्ठलाची पंचामृती पूजा झाल्यानंतर काकडारती होते. भजन झाल्यानंतर मंदिरातून श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडतो. राधाकृष्ण नाक्यातून रथ धनजीनाका येथे येतो. रथ हिशामुद्दिन बाबांच्या दर्ग्याजवळ येणार असल्याने कमिटीतर्फे दर्गा त्या दिवशी बंद केला जात नाही. शिवाय दिवेही सर्वत्र सुरू ठेवले जातात. त्याचवेळी पालखीतील नारळ दर्ग्याला अर्पण केला जातो. त्यानंतर पालखी दर्ग्यापुढील श्री दत्ताच्या घुमटीकडे येताच ‘कर्पुराती’ होते. भाविक लोटांगणे घालतात. त्यानंतर रथ धामापूरकर गल्लीतून धनजी नाकामार्गे पुन्हा देवळाकडे परततो. आजपर्यंत शेकडो वर्षांच्या या परंपरेमध्ये अजितबात कधीही खंड पडलेला नाही, शिवाय दोन्ही धर्मातील मंडळी श्रध्देने या सोहळ्यात सहभागी होतात. शांती, सौख्य व एकात्मतेची झलक यातून दिसून येते. पहाटेच्या वेळी रथ दर्ग्याजवळ येतो. श्रध्देने नारळ दर्ग्यात ठेवला जातो. त्यादिवशी दर्गा रात्रीच्या वेळी बंद केला जात नाही. भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्यात येत असल्याचे मंदिराचे ट्रस्टी अशोक मयेकर यांनी सांगितले.देवालाही एवढी आस असते. देवाच्या ठायीही एकात्मता जोपासली जाते. मग राष्ट्रीय एकात्मतेची पताका वाहणाऱ्या आपणामध्ये ही माणुसकीची आस केव्हा येणार? हाच एक प्रश्न आहे.