शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

विठुरायाला ओढ असते हिशामुद्दीन बाबांच्या दर्ग्याची

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

शेकडो वर्षांची परंपरा : एकात्मतेचे दर्शन देव घडवतात अन् आपण...?

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरीदेशात जाती-धर्मावरून वारंवार वाद उत्पन्न होतात. दंगे-धोपे होतात. देवाच्या ठिकाणी एकजण उच्च, तर दुसरा नीच असा भेदाभेद होतो. प्राचीन काळापासून चालत आलेले हे वाद विज्ञानयुगातही तसेच सुरु आहेत. पण, देवाच्या दरबारी असा भेदाभेद नाही. कारण रत्नागिरीचं दैवत असलेल्या विठुरायालाही हिशामुद्दीन दर्ग्याची ओढ लागलेलीच असते. देवाच्या ठायीही एकात्मता आहे, देवानेही ‘सारी मानवजात एकच’, असाच संदेश दिला आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो वर्षांपासून श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येत आहे. कार्तिकोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता श्री विठ्ठलाची पंचामृती पूजा झाल्यानंतर काकडारती होते. भजन झाल्यानंतर मंदिरातून श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडतो. राधाकृष्ण नाक्यातून रथ धनजीनाका येथे येतो. रथ हिशामुद्दिन बाबांच्या दर्ग्याजवळ येणार असल्याने कमिटीतर्फे दर्गा त्या दिवशी बंद केला जात नाही. शिवाय दिवेही सर्वत्र सुरू ठेवले जातात. त्याचवेळी पालखीतील नारळ दर्ग्याला अर्पण केला जातो. त्यानंतर पालखी दर्ग्यापुढील श्री दत्ताच्या घुमटीकडे येताच ‘कर्पुराती’ होते. भाविक लोटांगणे घालतात. त्यानंतर रथ धामापूरकर गल्लीतून धनजी नाकामार्गे पुन्हा देवळाकडे परततो. आजपर्यंत शेकडो वर्षांच्या या परंपरेमध्ये अजितबात कधीही खंड पडलेला नाही, शिवाय दोन्ही धर्मातील मंडळी श्रध्देने या सोहळ्यात सहभागी होतात. शांती, सौख्य व एकात्मतेची झलक यातून दिसून येते. पहाटेच्या वेळी रथ दर्ग्याजवळ येतो. श्रध्देने नारळ दर्ग्यात ठेवला जातो. त्यादिवशी दर्गा रात्रीच्या वेळी बंद केला जात नाही. भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्यात येत असल्याचे मंदिराचे ट्रस्टी अशोक मयेकर यांनी सांगितले.देवालाही एवढी आस असते. देवाच्या ठायीही एकात्मता जोपासली जाते. मग राष्ट्रीय एकात्मतेची पताका वाहणाऱ्या आपणामध्ये ही माणुसकीची आस केव्हा येणार? हाच एक प्रश्न आहे.