शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विठुरायाला ओढ असते हिशामुद्दीन बाबांच्या दर्ग्याची

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

शेकडो वर्षांची परंपरा : एकात्मतेचे दर्शन देव घडवतात अन् आपण...?

मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरीदेशात जाती-धर्मावरून वारंवार वाद उत्पन्न होतात. दंगे-धोपे होतात. देवाच्या ठिकाणी एकजण उच्च, तर दुसरा नीच असा भेदाभेद होतो. प्राचीन काळापासून चालत आलेले हे वाद विज्ञानयुगातही तसेच सुरु आहेत. पण, देवाच्या दरबारी असा भेदाभेद नाही. कारण रत्नागिरीचं दैवत असलेल्या विठुरायालाही हिशामुद्दीन दर्ग्याची ओढ लागलेलीच असते. देवाच्या ठायीही एकात्मता आहे, देवानेही ‘सारी मानवजात एकच’, असाच संदेश दिला आहे, याचं हे मूर्तिमंत उदाहरण. शेकडो वर्षांपासून श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकोत्सव साजरा करण्यात येत आहे. कार्तिकोत्सवाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता श्री विठ्ठलाची पंचामृती पूजा झाल्यानंतर काकडारती होते. भजन झाल्यानंतर मंदिरातून श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडतो. राधाकृष्ण नाक्यातून रथ धनजीनाका येथे येतो. रथ हिशामुद्दिन बाबांच्या दर्ग्याजवळ येणार असल्याने कमिटीतर्फे दर्गा त्या दिवशी बंद केला जात नाही. शिवाय दिवेही सर्वत्र सुरू ठेवले जातात. त्याचवेळी पालखीतील नारळ दर्ग्याला अर्पण केला जातो. त्यानंतर पालखी दर्ग्यापुढील श्री दत्ताच्या घुमटीकडे येताच ‘कर्पुराती’ होते. भाविक लोटांगणे घालतात. त्यानंतर रथ धामापूरकर गल्लीतून धनजी नाकामार्गे पुन्हा देवळाकडे परततो. आजपर्यंत शेकडो वर्षांच्या या परंपरेमध्ये अजितबात कधीही खंड पडलेला नाही, शिवाय दोन्ही धर्मातील मंडळी श्रध्देने या सोहळ्यात सहभागी होतात. शांती, सौख्य व एकात्मतेची झलक यातून दिसून येते. पहाटेच्या वेळी रथ दर्ग्याजवळ येतो. श्रध्देने नारळ दर्ग्यात ठेवला जातो. त्यादिवशी दर्गा रात्रीच्या वेळी बंद केला जात नाही. भाविकांसाठी रात्रभर खुला ठेवण्यात येत असल्याचे मंदिराचे ट्रस्टी अशोक मयेकर यांनी सांगितले.देवालाही एवढी आस असते. देवाच्या ठायीही एकात्मता जोपासली जाते. मग राष्ट्रीय एकात्मतेची पताका वाहणाऱ्या आपणामध्ये ही माणुसकीची आस केव्हा येणार? हाच एक प्रश्न आहे.