शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

धनगर समाजाचे प्रश्न न सोडविल्यास उग्र आंदोलन छेडणार : प्रवीण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

लांजा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही ...

लांजा

: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. या समाजाचा राजकारणासाठी वापर करुन फेकून देण्याचे काम केल्याने अजूनही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजाचे प्रश्न सोडवले न गेल्यास कोकणामध्ये उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे कोकण दौऱ्यावर आले असता त्यांनी लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. त्यांनी सांगितले की, अद्यापही धनगर बांधवांना रस्ते, पाणी, शाळा, घरे, वीज आदी सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगरवाड्यावर असलेल्या शाळा पटसंख्या कमी असल्याने बंद करण्यात आल्या आहेत. अद्यापही रस्ते व विद्युत पुरवठा नसल्याने येथील समाज बांधव खितपत पडलेला आहे. या समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने ७ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवण्याचे काम महासंघ करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजय गोरे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष संदीप गोरे, रत्नागिरी युवक आघाडी अध्यक्ष अमृत गोरे, लांजा तालुकाध्यक्ष संजय गोरे, लांजा तालुका युवक अध्यक्ष जयवंत गोरे, संगमेश्वर तालुका संघटक मंगेश वरक, संगमेश्वर तालुकाध्यक्ष सागर वरक, लांजा तालुका संघटक गणेश लांबोर, राजापूर तालुकाध्यक्ष सुरेश कोकरे, राजापूर तालुका संघटक सचिन घौगुले, सातारा सोशल मीडिया अध्यक्ष विजय यमकर उपस्थित होते.