शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
4
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
5
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
6
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
7
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
8
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
9
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
10
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
11
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
12
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
13
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
14
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
15
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
16
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
18
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
19
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
20
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

विनय नातू महान : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 6:40 PM

असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

ठळक मुद्दे विनय नातू यांचे कर्तृत्वच महानभास्कर जाधव यांचा उपरोधिक टोला

गुहागर, दि. १३ : असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.

असगोली हे गाव सर्वसंमतीने गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले होते. यामुळे ज्या असगोलीचा सर्वसमावेशक असा विकास होणार होता, ते गाव नगरपंचायतीतून वगळण्यात आल्याचे माजी आमदार डॉ. विनय नातूंनी ग्रामस्थांना सांगून स्वत:ची मिरवणूक काढून घेतली. सत्ताबदल झाल्यानंतर या सत्तेचा दुरूपयोग करीत असगोली गाव नगरपंचायतीतून वगळल्याचे सांगत स्वत:चा सत्कार करून घेतला. परंतु, अद्यापपर्यंत असगोली गावाला नगरपंचायतीतून वगळण्याची अधिसूचना निघालेली नाही. २५ आॅक्टोबरपर्यंत ही अधिसूचना निघाली नाही तर डॉ. नातू यांचेच हसे होणार असून, त्यांचे कर्तृत्वच महान आहे, असा टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.गुहागरच्या ग्रामीण भागाचा दौरा पूर्ण केल्यानंतर आमदार जाधव हे गेले दोन दिवस गुहागर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रत्येक प्रभागात जात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना दिलेला विकासकामांचा शब्द, त्यांची झालेली पूर्तता याबाबतचा आढावा घेताना शहरातील नवे प्रश्न समजावून घेत ते सोडवण्याबाबत त्यांनी यावेळी तत्काळ निर्णय घेतले.

यावेळी नागरिकांनी जाधव यांच्याकडे असगोलीला नगर पंचायतीतून वगळण्यात आल्याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा अत्यंत तूटपुंजा असतो. त्यामुळे विकासाला चालना मिळायला हवी असेल तर गावात नगरपंचायत व्हावी किंंवा गाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ट व्हावे, यासाठी गावांची धडपड सुरु असते. परंतु, लोकांचा विकास होऊ नये, हीच इच्छा विनय नातू यांची असावी. म्हणूनच त्यांनी हा सारा खटाटोप केल्याचे जाधव म्हणाले.या दौऱ्यात पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, नगराध्यक्षा स्नेहा भागडे, उपनगराध्यक्ष नरेश पवार, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक, सभापती आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Vinay Natuविनय नातूkonkanकोकण