शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

चाकरमान्यांच्या घरी ग्रामस्थ साजरा करणार गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 14:56 IST

हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे.

ठळक मुद्दे हातिस, टेंब्ये ग्राम कृती दलाचा अभिनव उपक्रमचाकरमान्यांच्या घरात स्थानापन्न होणार गणेशमूर्ती

रत्नागिरी : गावी आल्यावर क्वारंटाईन, मुंबईत गेल्यावर पुन्हा क्वारंटाईन, त्यामुळे गणपतीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची द्विधा अवस्था झाली आहे. चाकरमान्यांची ही अडचण लक्षात घेऊन हातिस, टेंब्ये येथील ग्राम कृती दलाने चाकमान्यांच्या बंद घरात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राम कृती दलाच्या या संकल्पनेमुळे घरात गणेशाची पूजा करण्याची परंपरा कायम राहणार आहे.शिमगोत्सवासाठी गावी पालखीसाठी आलेले चाकरमानी गेले दोन ते अडीच महिने लॉकडाऊनमुळे गावीच अडकून पडले होते. हे सर्वजण मुंबईला परत गेल्यानंतर पुन्हा गणेशोत्सवासाठी गावी येणे त्यांना शक्य नाही.

त्यातच गावी आल्यावर दहा दिवसांचे क्वारंटाईन, पाच दिवसांचा गणेशोत्सव आणि पुन्हा मुंबईत गेल्यावर १४ दिवसांचे क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यातही एका दिवसासाठी यायचे म्हटले तरी कोरोना चाचणी अत्यावश्यकच आहे. या अटींमुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकमान्यांची अडचण झाली आहे. त्यातही नोकरदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.गणेशोत्सवासाठी गावी येऊ न शकणाऱ्या पण गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये अशा चाकरमान्यांसाठी हातिस, टेंब्ये ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर यांनी अभिनव संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील बंद घरामध्ये ग्राम कृती दलातर्फे दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी लागणारा खर्च चाकरमानी मुंबईतून गावी पाठवून देणार आहेत. कांचन नागवेकर यांच्या संकल्पनेला चाकरमान्यांनीही प्रतिसाद दिला असून, गावातील ५ कुटुंबियांनी त्याला होकार दर्शविला आहे. त्यामुळे गावी येऊ न शकणाऱ्या चाकरमान्यांच्या घरीही यावर्षी गणेशोत्सव साजरा होणार आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवRatnagiriरत्नागिरी