शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रस्त्याची झाली चाळण, बिजघर येथील गावकऱ्यांना करावा लागतोय जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:09 IST

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही.

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही. असाच अनुभव खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील गावकऱ्यांना येत आहे. रस्त्याची चाळण झाली असून प्रशासन त्याची दुरुस्ती करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्तादुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध नसल्याची सबब जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक व गर्भवती महिला यांना तातडीच्या उपचारासाठी घेऊन जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार करून या समस्येकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

याबाबतची तक्रार आपले सरकार पोर्टलवरही नोंदवण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा ५१ लाखांचा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून प्राप्त होणार निधी व शासन निकष यांना अधिन राहून रस्त्याचे काम योग्य त्या कार्यालयामध्ये मंजूरीसाठी प्रस्तावित करण्याचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेकडून मिळाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड