शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

रस्त्याची झाली चाळण, बिजघर येथील गावकऱ्यांना करावा लागतोय जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:09 IST

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही.

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही. असाच अनुभव खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील गावकऱ्यांना येत आहे. रस्त्याची चाळण झाली असून प्रशासन त्याची दुरुस्ती करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्तादुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध नसल्याची सबब जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक व गर्भवती महिला यांना तातडीच्या उपचारासाठी घेऊन जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार करून या समस्येकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

याबाबतची तक्रार आपले सरकार पोर्टलवरही नोंदवण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा ५१ लाखांचा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून प्राप्त होणार निधी व शासन निकष यांना अधिन राहून रस्त्याचे काम योग्य त्या कार्यालयामध्ये मंजूरीसाठी प्रस्तावित करण्याचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेकडून मिळाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड