शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रस्त्याची झाली चाळण, बिजघर येथील गावकऱ्यांना करावा लागतोय जीव मुठीत घेऊन प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:09 IST

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही.

कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही. असाच अनुभव खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील गावकऱ्यांना येत आहे. रस्त्याची चाळण झाली असून प्रशासन त्याची दुरुस्ती करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्तादुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधीच उपलब्ध नसल्याची सबब जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे.

खेड तालुक्यातील बिजघर ( बौद्धवाडी) गावातील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. गावकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक व गर्भवती महिला यांना तातडीच्या उपचारासाठी घेऊन जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी तक्रार करून या समस्येकडे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

याबाबतची तक्रार आपले सरकार पोर्टलवरही नोंदवण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा ५१ लाखांचा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. शासनाकडून प्राप्त होणार निधी व शासन निकष यांना अधिन राहून रस्त्याचे काम योग्य त्या कार्यालयामध्ये मंजूरीसाठी प्रस्तावित करण्याचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेकडून मिळाले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKhedखेड