शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच

By admin | Updated: June 23, 2015 00:44 IST

वाहतूक ठप्प : कुळवंडी, खोपी, पिरलोटे येथे दरड कोसळली, १८ गावांचा संपर्क तुटला

खेड : गेले ४ दिवस सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कुळवंडी गावादरम्यानची मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे़ यामुळे या भागातील तिसंगी, बिजघर, खोपी, शिरगाव आणि धामणंद गावाकडील जवळपास १८ गावांकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.खेड शहरामध्ये मासळी आणि मटण मार्केटमध्ये जगबुडी नदीचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे़ तसेच नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात आल्याने दापोली ते खेड मार्ग रविवारी रात्रीपासूनच बंद झाला. मात्र सोमवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने दुपारनंतर हे पाणी ओसरले आणि हा मार्ग खुला करण्यात आला़ खेडमध्ये झालेल्या सलग ४ दिवसातील अतिवृष्टीमुळे कशेडी घाटामध्ये रविवारी दरड कोसळली होती. ही दरड आता बाजूला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. खेडमधील जगबुडी आणि नारिंगी नदी यांनी धोक्याची पातळी गाठली असून खेड नगर परिषदेने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सोमवार पहाटेपासूनच शहरातील मासळी आणि मटण मार्केटच्या इमारतीलगत पाणी आल्याने भीती निर्माण झाली होती. तसेच हे पाणी शहरात घुसल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगली होती. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतल्याने दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील भरलेले पाणी ओसरले तर नारिंगी नदीचे पाणीदेखील ओसरायला सुरूवात झाली.सोमवारी कुळवंडीमध्ये सकाळी ९.३० वाजता दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे तिसंगीसह जवळपास १८ गावाकडील दळणवळण यंत्रणा बंद पडल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती़ मात्र तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ही दरड बाजूला करण्यात कामगारांना यश मिळाले आहे. तोपर्यंत पर्यायी असलेल्या धामणंद मार्गाकडून ही वाहतूक वळवण्यात आली. दिवसभर ही दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते तर लोटेनजीकच्या पीरलोटे परिसरातही ही दरड कोसळली आहे. रविवारी रात्री सुकिवली आणि भरणे या गावांना जोडणाऱ्या चोरद नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने इकडील ४० गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी दुपारनंतर हे पाणी पुर्ण ओसरल्याने वाहतूक पुर्ववत झाली. तसेच कशेडी घाटात शनिवारी आणि रविवारी कोसळलेल्या दरड हटविण्यात आल्यानंतर सोमवारी वाहतूक पूर्ववत झाली आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय खोपी-धामणंद रोडवरील पगडेवाडी आणि सुतारवाडीदरम्यान रस्त्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडली आहे. (प्रतिनिधी)