शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच ...

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.

अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेले १८ महिने जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून आदेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षापासून आफ्रोहच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सातत्याने अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची आवश्यकता नसताना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २५ सप्टेंबर २०२० रोजी मार्गदर्शन मागविण्यात आले. विविध विभागातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन ते आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव विलास देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळाला नाही.

१८ महिने झाले तरीही न्याय न मिळाल्याने विलास देशमुख यांनी आफ्रोह संघटनेच्यावतीने सोमवारी साखळी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना विलास देशमुख यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय तसेच आफ्रोह संघटनेचे किशोर रोडे, गजानन उमरेडकर, बापूराव रोडे, पंडित सोनवणे, राजेश सनगाळे, कैलास बाविस्कर, प्रियांका इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी दत्ता भडकवाड यांनी या उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ सप्टेंबर २०२० रोजी सामान्य प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय होईल, तो कळवितो, असे यावेळी सांगण्यात आले.

..................

फोटो मजकूर

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमनचे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.