शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच ...

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.

अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेले १८ महिने जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून आदेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षापासून आफ्रोहच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सातत्याने अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची आवश्यकता नसताना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २५ सप्टेंबर २०२० रोजी मार्गदर्शन मागविण्यात आले. विविध विभागातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन ते आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव विलास देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळाला नाही.

१८ महिने झाले तरीही न्याय न मिळाल्याने विलास देशमुख यांनी आफ्रोह संघटनेच्यावतीने सोमवारी साखळी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना विलास देशमुख यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय तसेच आफ्रोह संघटनेचे किशोर रोडे, गजानन उमरेडकर, बापूराव रोडे, पंडित सोनवणे, राजेश सनगाळे, कैलास बाविस्कर, प्रियांका इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी दत्ता भडकवाड यांनी या उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ सप्टेंबर २०२० रोजी सामान्य प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय होईल, तो कळवितो, असे यावेळी सांगण्यात आले.

..................

फोटो मजकूर

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमनचे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.