शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने विलास देशमुख यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच ...

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमन (आफ्रोह) चे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.

अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेले १८ महिने जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून आदेश देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षापासून आफ्रोहच्या रत्नागिरी शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सातत्याने अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्याची आवश्यकता नसताना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २५ सप्टेंबर २०२० रोजी मार्गदर्शन मागविण्यात आले. विविध विभागातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन ते आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील एकमेव विलास देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळाला नाही.

१८ महिने झाले तरीही न्याय न मिळाल्याने विलास देशमुख यांनी आफ्रोह संघटनेच्यावतीने सोमवारी साखळी उपोषणाला प्रारंभ केला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देताना विलास देशमुख यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय तसेच आफ्रोह संघटनेचे किशोर रोडे, गजानन उमरेडकर, बापूराव रोडे, पंडित सोनवणे, राजेश सनगाळे, कैलास बाविस्कर, प्रियांका इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी दत्ता भडकवाड यांनी या उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाने २५ सप्टेंबर २०२० रोजी सामान्य प्रशासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय होईल, तो कळवितो, असे यावेळी सांगण्यात आले.

..................

फोटो मजकूर

अधिसंख्य पदाचे आदेश न मिळाल्याने ऑर्गनायझेशन फाॅर राईट ऑफ ह्युमनचे विलास देशमुख यांनी कुटुंबीयांसह तसेच संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर तसेच महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांच्यासमवेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले.