शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

विलास देशमुखांचे कुटुंबीयांसह ५ रोजी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेली दीड वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हाधिकारी ...

रत्नागिरी : अधिसंख्य पदाचे आदेश मिळण्यासाठी सेवासमाप्त लिपिक-टंकलेखक विलास देशमुख गेली दीड वर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय मात्र शासन निर्णयातील सुस्पष्ट आदेश डावलून येनकेन प्रकारे मार्गदर्शनाच्या नावाखाली अधिसंख्य पदाचे आदेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ देशमुख हे त्यांच्या कुटुंबीयांसह आफ्रोह संघटनेसोबत ५ जुलै रोजी साखळी उपोषण करणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, एवढीच माफक अपेक्षा देशमुख यांच्यासह आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी घावट यांनी व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, एस. टी., महामंडळातील सेवासमाप्त कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदाचे आदेश प्राप्त होऊन आता सेवा बजावत आहेत. मात्र, केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील देशमुख यांनाच अद्यापही न्याय मिळालेला नाही. नियुक्ती प्राधिकारी किंवा संबंधित विभागानेच हे आदेश काढावयाचे असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारात दिली आहे.

शासन निर्णयातील अधिसंख्य पदामुळे सेवेत असलेले, सेवानिवृत्त झालेले व मयत झालेल्या कुटुंबीयांना जीवन जगण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कोविड-१९ बाबत योग्य ती दक्षता घेऊन आफ्रोह या संघटनेने राज्यभर एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जुलै रोजी उपोषण करणार आहेत.