शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना ...

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्रामपंचायत पातळीवरही विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

तालुक्यातील राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे या १३ ग्रामपंचायती समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने या भागातील सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये मागील दोन दिवसांत विशेष बैठका घेऊन स्थानिक पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकृतीदल यांच्याशी चर्चा करण्यात आल्या असून ग्रामपंचायत पातळीवर तातडीच्या मदतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर तालुका पातळीवर १३ नोडल अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पक्क्या घरात स्थलांतरित करतानाच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने नियोजन केल्याचे वराळे यांनी सांगितले. त्या - त्या ग्रामपंचायतींमध्ये पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी, अत्यावश्यक साहित्य असणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे़ तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा व अन्य सेवा सुविधा पुरविण्याबाबत विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़.

तालुक्यात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सागवे, कातळी, माडबन, आंबोळगड, वाडापेठ या भागांकडे विशेष लक्ष राहणार असून, या १३ ग्रामपंचायतीतील सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकांचा एक व्हाॅटसअ‍ॅप ग्रुप तयार करून वादळ परिस्थितीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्या त्या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे़