शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

राजापुरातील १३ ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना ...

राजापूर : ताैक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका प्रशासन सतर्क झाले असून, तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या १३ ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १३ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्रामपंचायत पातळीवरही विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.

तालुक्यातील राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे या १३ ग्रामपंचायती समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने या भागातील सर्व ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये मागील दोन दिवसांत विशेष बैठका घेऊन स्थानिक पातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामकृतीदल यांच्याशी चर्चा करण्यात आल्या असून ग्रामपंचायत पातळीवर तातडीच्या मदतीसाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. तर तालुका पातळीवर १३ नोडल अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कच्च्या घरात राहणाऱ्या ग्रामस्थांना पक्क्या घरात स्थलांतरित करतानाच आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाने नियोजन केल्याचे वराळे यांनी सांगितले. त्या - त्या ग्रामपंचायतींमध्ये पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी, अत्यावश्यक साहित्य असणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे़ तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा व अन्य सेवा सुविधा पुरविण्याबाबत विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली़.

तालुक्यात समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या सागवे, कातळी, माडबन, आंबोळगड, वाडापेठ या भागांकडे विशेष लक्ष राहणार असून, या १३ ग्रामपंचायतीतील सर्व अत्यावश्यक सेवेतील घटकांचा एक व्हाॅटसअ‍ॅप ग्रुप तयार करून वादळ परिस्थितीच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्या त्या भागातील मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी संभाव्य वादळाचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले आहे़