शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:35 IST

विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.

ठळक मुद्दे विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी युतीचे दरवाजे अनेकांसाठी खुले

रत्नागिरी : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षांतराच्या जोरदार हालचाली आहेत. काँग्रेस आघाडीमध्ये राजापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. तेथे राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव इच्छुक आहेत. त्यामुळे अजित यशवंतराव यांना काँग्रेसमध्ये घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतील एका बैठकीत केली आहे.

याखेरीज राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्याबाबतही पक्षांतराच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. भास्कर जाधव हे शिवसेनेत, तर संजय कदम भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या दोन्ही आमदारांनी अजून त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.अनेक नेत्यांच्या पक्षांतराबाबतची बोलणी सुरू असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीबाबत अजून कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. प्रत्येक मतदारसंघात अशा घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रचार नेमका कोणाचा करायचा, याबाबत कार्यकर्तेही अजून संभ्रमातच आहेत.पक्षांतराची चर्चाशिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता कमी असल्याने जर-तरच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिक रंगत आली आहे. युती झाली तरी मतदारसंघ वाटपात काय होणार आणि त्याचे उमेदवार निवडीवर काय परिणाम होणार, याच्या चर्चाही जोर धरत आहेत. इच्छुकांनी मात्र मतदार संघात दौरे वाढवले असून, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावू लागले आहेत.युती स्वबळ आजमावेलशिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या अन्य पक्षातील लोकांची संख्या आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावयाची उमेदवारी यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. स्वबळाच्या लढाईत अजूनही अनेक पक्षांतरे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेची तयारी कोणीच सुरू केलेली नाही. 

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी