शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

भाज्या, फळे मुबलक, दर मात्र ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने फळांबरोबर सुका मेव्यालाही वाढती मागणी आहे.

गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येत असल्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा मालाच्या दुकानांतून तेल, साखर यासाठी विशेष मागणी होत आहे. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून पूजेचे स्वरूप घरगुती ठेवण्यात येत असले तरी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मोदकाचे तयार पीठ, गूळ, वेलची यासह प्रसादासाठी साखर फुटाणे, खडीसाखर, सुका मेवा यांची खरेदी सुरू आहे.

बाजारात सध्या सर्वप्रकारच्या भाज्या व फळे मुबलक स्वरुपात उपलब्ध आहेत. बहुतांश भाज्या ६० ते ७० रुपये, फळांचे दर १०० ते २५०च्या घरात आहेत. देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

गावठी भाज्यांसह काकडी, चिबूड, दुधी भोपळे बाजारात उपलब्ध आहेत. मुळा, माठ पालेभाज्यांसह भेंडी, कारली, गवार, पडवळ, दोडके, वालीच्या शेंगा, दुधी भोपळा विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांकडून गावठी भाज्यांची प्राधान्याने खरेदी केली जात आहे. चिबूड, काकडी नगावर विक्री होत असली तरी आकारानुसार दर सांगण्यात येत आहेत.

बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा शंभर रुपयांना पाच किलो दराने विकण्यात येत आहे. लसूणची विक्री ५० रुपये किलाेने सुरू आहे.

बाजारात देशी सफरचंद मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाराने लहान असलेली सफरचंद ६० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असून, सफरचंदासाठी वाढती मागणी आहे.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतो. गावठी भाज्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने सध्यातरी दर नियंत्रणात आहेत. मात्र, अजून दर खाली येण्याची आवश्यकता आहे. शेतकरी भाज्या, टोमॅटोला दर मिळत नसल्याने रस्त्यावर फेकत असताना, आमच्या शहरात मात्र दर भरमसाठ आहेत. दरावर नियंत्रण नसल्यामुळेच एकप्रकारे ग्राहकांची लूट सुरू आहे.

- ऋतुजा शिंदे, रत्नागिरी

एकीकडे शेतकरी दर मिळत नसताना आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मात्र व्यापारी भाज्यांचे दर भरमसाठ आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. कांदा-बटाट्याचे दर अद्याप अनियंत्रित आहेत. भाज्याही ५० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. डाळी, कडधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ग्राहकांची फरपट होत आहे. दरावर नियंत्रणाची गरज आहे.

- प्रणाली पाटील, रत्नागिरी