शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या, फळे मुबलक, दर मात्र ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने फळांबरोबर सुका मेव्यालाही वाढती मागणी आहे.

गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येत असल्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा मालाच्या दुकानांतून तेल, साखर यासाठी विशेष मागणी होत आहे. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून पूजेचे स्वरूप घरगुती ठेवण्यात येत असले तरी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मोदकाचे तयार पीठ, गूळ, वेलची यासह प्रसादासाठी साखर फुटाणे, खडीसाखर, सुका मेवा यांची खरेदी सुरू आहे.

बाजारात सध्या सर्वप्रकारच्या भाज्या व फळे मुबलक स्वरुपात उपलब्ध आहेत. बहुतांश भाज्या ६० ते ७० रुपये, फळांचे दर १०० ते २५०च्या घरात आहेत. देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

गावठी भाज्यांसह काकडी, चिबूड, दुधी भोपळे बाजारात उपलब्ध आहेत. मुळा, माठ पालेभाज्यांसह भेंडी, कारली, गवार, पडवळ, दोडके, वालीच्या शेंगा, दुधी भोपळा विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांकडून गावठी भाज्यांची प्राधान्याने खरेदी केली जात आहे. चिबूड, काकडी नगावर विक्री होत असली तरी आकारानुसार दर सांगण्यात येत आहेत.

बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा शंभर रुपयांना पाच किलो दराने विकण्यात येत आहे. लसूणची विक्री ५० रुपये किलाेने सुरू आहे.

बाजारात देशी सफरचंद मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाराने लहान असलेली सफरचंद ६० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असून, सफरचंदासाठी वाढती मागणी आहे.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतो. गावठी भाज्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने सध्यातरी दर नियंत्रणात आहेत. मात्र, अजून दर खाली येण्याची आवश्यकता आहे. शेतकरी भाज्या, टोमॅटोला दर मिळत नसल्याने रस्त्यावर फेकत असताना, आमच्या शहरात मात्र दर भरमसाठ आहेत. दरावर नियंत्रण नसल्यामुळेच एकप्रकारे ग्राहकांची लूट सुरू आहे.

- ऋतुजा शिंदे, रत्नागिरी

एकीकडे शेतकरी दर मिळत नसताना आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मात्र व्यापारी भाज्यांचे दर भरमसाठ आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. कांदा-बटाट्याचे दर अद्याप अनियंत्रित आहेत. भाज्याही ५० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. डाळी, कडधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ग्राहकांची फरपट होत आहे. दरावर नियंत्रणाची गरज आहे.

- प्रणाली पाटील, रत्नागिरी