शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

भाज्या, फळे मुबलक, दर मात्र ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आहे. बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या, फळे मुबलक स्वरूपात उपलब्ध आहेत. घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने फळांबरोबर सुका मेव्यालाही वाढती मागणी आहे.

गणेशोत्सव घरोघरी साजरा करण्यात येत असल्यामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. किराणा मालाच्या दुकानांतून तेल, साखर यासाठी विशेष मागणी होत आहे. गणेशोत्सवात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून पूजेचे स्वरूप घरगुती ठेवण्यात येत असले तरी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मोदकाचे तयार पीठ, गूळ, वेलची यासह प्रसादासाठी साखर फुटाणे, खडीसाखर, सुका मेवा यांची खरेदी सुरू आहे.

बाजारात सध्या सर्वप्रकारच्या भाज्या व फळे मुबलक स्वरुपात उपलब्ध आहेत. बहुतांश भाज्या ६० ते ७० रुपये, फळांचे दर १०० ते २५०च्या घरात आहेत. देशी सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

गावठी भाज्यांसह काकडी, चिबूड, दुधी भोपळे बाजारात उपलब्ध आहेत. मुळा, माठ पालेभाज्यांसह भेंडी, कारली, गवार, पडवळ, दोडके, वालीच्या शेंगा, दुधी भोपळा विक्रीसाठी आले आहेत. ग्राहकांकडून गावठी भाज्यांची प्राधान्याने खरेदी केली जात आहे. चिबूड, काकडी नगावर विक्री होत असली तरी आकारानुसार दर सांगण्यात येत आहेत.

बाजारात कांदा २५ ते ३० रुपये तर बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा शंभर रुपयांना पाच किलो दराने विकण्यात येत आहे. लसूणची विक्री ५० रुपये किलाेने सुरू आहे.

बाजारात देशी सफरचंद मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकाराने लहान असलेली सफरचंद ६० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असून, सफरचंदासाठी वाढती मागणी आहे.

भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतो. गावठी भाज्याही बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने सध्यातरी दर नियंत्रणात आहेत. मात्र, अजून दर खाली येण्याची आवश्यकता आहे. शेतकरी भाज्या, टोमॅटोला दर मिळत नसल्याने रस्त्यावर फेकत असताना, आमच्या शहरात मात्र दर भरमसाठ आहेत. दरावर नियंत्रण नसल्यामुळेच एकप्रकारे ग्राहकांची लूट सुरू आहे.

- ऋतुजा शिंदे, रत्नागिरी

एकीकडे शेतकरी दर मिळत नसताना आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे मात्र व्यापारी भाज्यांचे दर भरमसाठ आकारून ग्राहकांची लूट करत आहेत. कांदा-बटाट्याचे दर अद्याप अनियंत्रित आहेत. भाज्याही ५० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. डाळी, कडधान्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे ग्राहकांची फरपट होत आहे. दरावर नियंत्रणाची गरज आहे.

- प्रणाली पाटील, रत्नागिरी