शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बामणोलीतील वीरचक्र विजेते हवालदार धोंडू जाधवांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी

By मनोज मुळ्ये | Updated: October 4, 2023 15:42 IST

सचिन मोहिते  देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण ...

सचिन मोहिते देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून लवकरच या स्मारकाला झळाळी मिळणार आहे. तसेच जाधव यांच्या पराक्रमाची गाथा तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.भारत सरकारकडून एखाद्या शूरवीरांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी वीरचक्र मिळणे ही फार मोठी दुर्मिळ बाब आहे. आणि हे अभिमानास्पद असणारे वीरचक्र पदक संगमेश्वर तालुक्यातील ६००-६५० लोकवस्तीच्या असणाऱ्या छोट्या बामणोली गावातील पराक्रमी सैनिक हवालदार कै. धोंडूजी गोविंद जाधव यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले होते. त्यांनी १९४७-४८ साली झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या काश्मीर युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्हि. व्हि गिरी यांच्या शुभ हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्याचबरोबर आदरणीय धोंडूजींना १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.भारत भूमीवर प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या या सुपुत्राचे स्मारक गावामध्ये आहे. यामध्ये हवालदार धोंडूजी जाधव यांचा चौथर्‍यावर बसविलेला अर्ध पुतळा, त्यांच्या पराक्रमाची माहिती आणि पत्र्याची शेड याचा समावेश आहे. स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. दि. २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मारकाच्या सुशोभीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. याची जबाबदारी गावकऱ्यांबरोबरच श्री. भागवत व त्यांच्या समितीने देखील घेतली आहे. यासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतीस्थळ  रत्नागिरी जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्व हुतात्मा झालेल्या जवानांचे दे.शी.प्र. मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये स्मृतीस्थळ उभारणे. पाकिस्तान, चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये रक्षण करताना स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण ४४ पराक्रमी शूरवीर सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्याचे स्मरण व्हावे आणि त्यातून त्यांनी सतत प्रेरणा घ्यावी या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने या सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतिस्थळ संस्थेच्या शहीद जवान स्मारकामध्ये बनविण्याचा संकल्प केला आहे. या स्मृतीस्थळामध्ये संगमरवरी दगडावर कोरलेल्या सर्व हुतात्मा जवानांची नावे, हुद्दा, वीरमरण दिनांक असलेल्या नामपाट्या, आदरांजली वाहण्याकरता संगमरवरी कट्टा, प्रकाश व्यवस्था आदि गोष्टींचा समावेश आहे. याचा अंदाजे खर्च रुपये २ लाख अपेक्षित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी