शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

बामणोलीतील वीरचक्र विजेते हवालदार धोंडू जाधवांच्या स्मारकाला मिळणार नवी झळाळी

By मनोज मुळ्ये | Updated: October 4, 2023 15:42 IST

सचिन मोहिते  देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण ...

सचिन मोहिते देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथील वीरचक्र विजेते हवालदार कै. धोंडू गोविंद जाधव यांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून लवकरच या स्मारकाला झळाळी मिळणार आहे. तसेच जाधव यांच्या पराक्रमाची गाथा तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.भारत सरकारकडून एखाद्या शूरवीरांना त्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी वीरचक्र मिळणे ही फार मोठी दुर्मिळ बाब आहे. आणि हे अभिमानास्पद असणारे वीरचक्र पदक संगमेश्वर तालुक्यातील ६००-६५० लोकवस्तीच्या असणाऱ्या छोट्या बामणोली गावातील पराक्रमी सैनिक हवालदार कै. धोंडूजी गोविंद जाधव यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले होते. त्यांनी १९४७-४८ साली झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या काश्मीर युद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्हि. व्हि गिरी यांच्या शुभ हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले होते. त्याचबरोबर आदरणीय धोंडूजींना १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.भारत भूमीवर प्राणाची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या या सुपुत्राचे स्मारक गावामध्ये आहे. यामध्ये हवालदार धोंडूजी जाधव यांचा चौथर्‍यावर बसविलेला अर्ध पुतळा, त्यांच्या पराक्रमाची माहिती आणि पत्र्याची शेड याचा समावेश आहे. स्मारकाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्याचे काम ग्रामपंचायत व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. दि. २५ ऑगस्टला झालेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत स्मारकाच्या सुशोभीकरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. याची जबाबदारी गावकऱ्यांबरोबरच श्री. भागवत व त्यांच्या समितीने देखील घेतली आहे. यासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतीस्थळ  रत्नागिरी जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सर्व हुतात्मा झालेल्या जवानांचे दे.शी.प्र. मंडळाच्या शहीद जवान स्मारकामध्ये स्मृतीस्थळ उभारणे. पाकिस्तान, चीन विरुद्धच्या युद्धांमध्ये रक्षण करताना स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकूण ४४ पराक्रमी शूरवीर सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्याचे स्मरण व्हावे आणि त्यातून त्यांनी सतत प्रेरणा घ्यावी या उद्देशाने देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने या सर्व हुतात्मा जवानांचे स्मृतिस्थळ संस्थेच्या शहीद जवान स्मारकामध्ये बनविण्याचा संकल्प केला आहे. या स्मृतीस्थळामध्ये संगमरवरी दगडावर कोरलेल्या सर्व हुतात्मा जवानांची नावे, हुद्दा, वीरमरण दिनांक असलेल्या नामपाट्या, आदरांजली वाहण्याकरता संगमरवरी कट्टा, प्रकाश व्यवस्था आदि गोष्टींचा समावेश आहे. याचा अंदाजे खर्च रुपये २ लाख अपेक्षित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी