शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

लाल मातीतही घेतली विविध पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:29 IST

मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी गावचे रहिवासी मुनाफ खतीब सुरुवातीला चालक म्हणून काम करीत होते. वडिलोपार्जित भात शेती होती. भात ...

मुंबई गोवा महामार्गावरील उक्षी गावचे रहिवासी मुनाफ खतीब सुरुवातीला चालक म्हणून काम करीत होते. वडिलोपार्जित भात शेती होती. भात शेतीनंतर जमीन पुढच्या पावसाळ्यापर्यंत मोकळीच असायची. खासगी चालक असलेल्या मुनाफ यांनी बारमाही शेती करण्याचा निर्णय घेतला. नदीलगतच शेती असल्याने पाण्याची उपलब्धता झाली. लाल मातीत त्यांनी कलिंगड, हिरवी मिरची, पावटा, कुळीथ, वांगी, झेंडू तसेच वालीच्या शेंगांची लागवड केली.

सेंद्रिय शेतीकडेच अधिक कल असल्याने मुनाफ यांनी शेतीला जोड दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी दहा म्हशी व गाई राखल्या होत्या. रत्नागिरीत जाऊन ते दूध विक्री करीत असत. शेणाचा वापर शेणखतासाठी करीत असत. म्हशी व गायीबरोबर त्यांनी बकऱ्याही पाळल्या आहेत. वडिलोपार्जित काही आंबा कलमे असून, आंबा उत्पादनही ते घेत आहेत. स्वत:ची जागा कमी असल्याने आजूबाजूच्या शेतमालकांकडून मक्तेदारी पद्धतीने जागा घेऊन भाजीपाला लागवड केली आहे; मात्र आता म्हशीची संख्या थोडी कमी केली आहे.

वीस गुंठ्यात त्यांनी अगस्ता वाणाचे कलिंगड लागवड केली होती. तण येऊ नये, यासाठी मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला. भाजीपाला, कलिंगड पिके घेत असताना, तुषार सिंचन योजनेचा अवलंब ते करीत आहेत. ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. शिवाय कीडरोगासाठी तसेच पिकाच्या वाढीसाठी पाण्यात मिसळणारे खत पिकाला देण्यासाठी तुषार सिंचनचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे मत आहे.

मजुरांची उपलब्धता ही प्रामुख्याने शेतकऱ्यांना भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे त्यांनी पॉवर ट्रिलर, ग्रासकटर, पॉवर स्प्रेअरसारख्या यांत्रिक अवजारांचा वापर करीत आहेत. २० गुंठ्यात त्यांना आठ टन कलिंगडाचे उत्पन्न लाभले आहे. विक्रीसाठी त्यांना फारसे कष्ट करावे लागले नाहीत. गावात तसेच रत्नागिरीत त्यांना विक्री करता आली.

पावसाळ्यात झेंडूची लागवड केली होती. भात काढताच त्यांनी झेंडू लावला. मार्गशीर्ष महिन्यात त्यांच्याकडील झेंडू तयार झाल्याने विक्री चांगली झाली. नदीकिनारी शेती असल्याने पाण्याची उपलब्धता तर झाली, शिवाय लाल मातीत पावटा, कुळीथ, वाली, हिरवी मिरची, वांगीचेही उत्पादन चांगले मिळाले. झेंडूची रोपे त्यांनी सांगलीतील नर्सरीतून आणली होती; मात्र अन्य पिकांसाठी रोपे त्यांनी स्वत:च तयार केली.

सध्या त्यांच्या शेतीत भाजीपाला तसेच मका लावला आहे. दुधत्या जनावरांसाठी मका हे खाद्य पोषक ठरत आहे. शिवाय खाण्यासाठी मक्याला चांगली मागणी होत आहे. रत्नागिरी तालुका कृषी विभागाकडून त्यांना सतत मार्गदर्शन लाभत आहे. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

..................

पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर कमी श्रमात व कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न मिळविता येते. मल्चींगसाठी खर्च एकदाच होतो; मात्र त्यामुळे तण/रान उगवणे व ते काढण्याचा त्रास वाचतो. पिकांना जादा पाणी दिले तरीही झाडे मृत होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तुषार सिंंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.

मुनाफ खतीब, शेतकरी, उक्षी.