शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विद्यार्थी वाहतूक करणारे व्हॅन चालक आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : कोरोना संसर्गामुुळे गेल्या दीड वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे खासगी स्कूलबस चालक आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षाचालक ...

रत्नागिरी : कोरोना संसर्गामुुळे गेल्या दीड वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे खासगी स्कूलबस चालक आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत आहेत.

कोरोनाचा संसर्ग मुलांना होऊ नये, यासाठी गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शाळांत विद्यार्थ्यांना ने - आण करणाऱ्या स्कूल बसेसही गेली दीड वर्षे एकाच जागी उभ्या असल्याने चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. स्कूल बससाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा बंद असल्या तरी बस मालकांना शासनाचा कर भरावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट ओढावले आहे.

उत्पन्नाचा स्रोत बंद असल्याने बँकेचे कर्ज व कर कसा भरायचा असा सवाल स्कूल बस मालकांकडून विचारण्यात येत आहे. कर्जफेडीसाठी बँकांनी तगादा लावला आहे. बसचा परवाना स्कूल बस या नावाने असल्याने शाळा बंद असल्या तरी स्कूलबस अन्य कामासाठी वापरण्यास परवानगी नाही. भविष्यात शाळा चालू झाल्या तरी दीड वर्षे एकाच जागी उभ्या असलेल्या व्हॅन सुरू करण्यासाठी स्कूल बस मालकांना किमान ४० ते ५० हजार दुरूस्तीसाठी खर्च येणार आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने अनेकांना दंडव्याज सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाने बँकांचे व्याज व पासिंग, विमा हप्त्यात सवलत द्यावी, अशी मागणी स्कूलबस चालकांकडून होत आहे.

स्कूल बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा दारातच उभ्या आहेत. त्यामुळे चालक घरीच होते. कोरोना काळात काहींनी रूग्णवाहिकेवर पर्यायी चालक म्हणून तर काही सेवाभावी संस्थातर्फे रूग्णांना ने-आण करण्यासाठी तसेच लसीकरणासाठी जाणाऱ्या वृद्धांसाठी चालकांनी मोफत सेवाही दिली होती.

------------

शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. परंतु, कोरोनामुळे शासकीय नियम जारी केले आहेत. दीड वर्षे उत्पन्नाचा स्त्रोतच बंद असल्याने संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने किमान बँकांचे कर्ज हप्ते, वाहन पासिंग, कराच्या रकमेत सवलत देण्यात यावी

- मंदार रामाणे, वाहनचालक