शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

वायकरांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

By admin | Updated: January 10, 2016 00:37 IST

नीलेश राणे यांचा इशारा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका

 रत्नागिरी : घरपट्टी वसुलीला स्थगिती देण्यात आल्यानंतर वर्षभर ग्रामपंचायतींचे पूर्ण उत्पन्नच ठप्प झाले. गावाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींमधील कामेच त्यामुळे ठप्प झाली. त्यांच्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना अनुदान किंवा मदत देता आली असती; पण रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना या प्रश्नाची जाणच नाही. जर हे सत्ताधारी सुधारले नाहीत तर पालकमंत्र्यांची गाडी जिल्ह्यात कोठेही फिरू देणार नाही, असा सणसणीत इशारा माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी दिला. शुक्रवारी रामपूरचा दौरा आटोपून रत्नागिरीत दाखल झालेल्या राणे यांनी शनिवारी काँग्रेसभुवन येथे पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकारवर टीका करतानाच त्यांनी पालकमंत्री वायकर यांच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. वर्षभर घरपट्टी आकारणे बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा उत्पन्नाचा मार्गच बंद झाला आहे. सक्षम अशा ग्रामपंचायतींची संख्या खूपच कमी आहे. घरपट्टीखेरीज कसलेही उत्पन्न नाही, अशा ग्रामपंचायतीच असंख्य आहेत. पण, त्याबाबत सरकारला कोणतेही सोयसुतक नाही. यात सर्वांत मोठा दोष पालकमंत्र्यांचा आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीने त्यासाठी काही ना काही तरतूद करणे गरजेचे होते; पण ज्यांच्या मतदारसंघात झोपडपट्टीच भरपूर आहे, अशा वायकर यांना घरपट्टी आणि झोपडपट्टीतील फरकच कळत नसावा, असा टोला राणे यांनी हाणला. जिल्ह्यातील या प्रलंबित प्रश्नांमुळे जनतेचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. (प्रतिनिधी) कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करा रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी ते आपल्या मुंबईतील मतदारसंघाचा आणि कोयनेच्या पाण्याचाच जास्त विचार करतात. त्यामुळे त्यांना कोयनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करावे, असे पत्र आता आपण उद्धव ठाकरे यांना पाठविणार आहोत, असा टोला राणे यांनी मारला. जेव्हा पाहावे तेव्हा वायकर कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्याचाच विचार करतात. त्यांना दुसरे काही सुचतच नाही, असेही ते म्हणाले.