शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

लसीकरण, योगामुळे ‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांचे तातडीने झालेले लसीकरण यामुळे त्यांची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांचे तातडीने झालेले लसीकरण यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर योगा, प्राणायाम हेही केले जात असल्याने पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा कमी झाले आहे.

पहिल्या लाटेत १९ पोलीस अधिकारी आणि १९७ कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेपूर्वीच पोलिसांचे लसीकरण सुरू झाले. पहिला डोस ९६ टक्के तर दुसरा डोस ९० टक्के पोलिसांना देण्यात आल्याने बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दुसऱ्या लाटेत २ अधिकारी आणि ६२ कर्मचारी बाधित झाले असले तरीही त्यांच्यापैकी बहुतांश जणांना सौम्य लक्षणे होती.

विशेष दक्षता...

कोरोनाच्या काळात पोलीस कोरोनामुक्त रहावेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग दक्ष आहेत. सध्या पोलिसांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम करून घेतले जात आहे. दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून पोलिसांना आर्सेनिक गोळ्या, वाफेचे मशीन, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर तसेच ऑक्सिमीटर, थर्मामीटर दिले आहे.

कोरोना काळात पोलीस दल अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलीस कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, आता आम्ही दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम करतो. मी स्वत: गरम पाणी, काढा पितो. स्वत:ची व घरातील लोकांची विशेष काळजी घेतो. त्यामुळेच आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित रहात आले.

- महेश कुबडे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल, रत्नागिरी

पहिल्या लाटेवेळी थेट नागरिकांच्या संपर्कात येऊन काम करत होतो. त्यामुळे अनेक कर्मचारी बाधित झाले होते. आता कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या दिल्या आहेत. त्या रोज घेते व सी व डी व्हिटॅमिन स्प्रेचा वापर करते. सकाळी व संध्याकाळी गरम पाणी पिते व घरच्यांनाही देते. बाहेरून आले की घरातल्यांपासून लांब राहते.

- श्रीया साळवी, पोलीस नाईक, रत्नागिरी

दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून शासनाने पोलिसांच्या लसीकरणावर भर दिला. त्यामुळेच आता जवळपास १०० टक्के लसीकरण होत आले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ‘सहेत संवाद’ सारख्या उपक्रमामुळेही कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले.

- डाॅ. मोहितकुमार गर्ग,

जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी