शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून लसीकरण बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एकच दिवस पुरेल इतका लसींचा साठा असल्याने शनिवारपासून जिल्ह्याचे लसीकरण बंद करावे लागणार आहे, ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एकच दिवस पुरेल इतका लसींचा साठा असल्याने शनिवारपासून जिल्ह्याचे लसीकरण बंद करावे लागणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्याचा काेरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी लसीकरणाबाबतची माहिती पुढे आली. केंद्र शासनाने राज्य शासनाकडे लसीचा साठा दिल्यानंतरच पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी आढावा घेण्यात आला त्यावरुन केवळ शुक्रवारपुरते ८३२ डोस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक होते. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागाकडून शनिवारपासून लसीकरण थांबवावे लागेल आणि लसीकरणाची मोहीम लस आल्यानंतरच सुरु करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सामंत म्हणाले.

केंद्र शासनाकडून राज्यांना लस वाटप करण्याचा चार्ट आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांना लस किती दिली आहे. त्यावरुन केंद्र सरकार लसीचा पुरवठा कुठे जाणीवपूर्वक करतेय की कुठे जाणीवपूर्वक करत नाही, हे सिध्द झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे की, महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लस देण्याची क्षमता आहे. ती ६० लाख करण्यापर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे राज्याला ४० लाख लस उपलब्ध करुन द्या, असे त्यांनी सांगितले असल्याने यावर केंद्र सरकार येत्या दोन दिवसात काय निर्णय घेतेय, हे लवकरच समजेल, असेही ते म्हणाले.

लसीच्या वाया जाण्याबाबत सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे लस वाया जाण्याचे प्रमाण ३ ते ३.५० टक्के आहे, तर महाराष्ट्राचे ३.२७ टक्के आहे. इतर राज्यात ते जास्त आहे. पण दुर्दैवाने सर्वांना महाराष्ट्र दिसते. बाकीची राज्य दिसत नसल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली.