शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून लसीकरण बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एकच दिवस पुरेल इतका लसींचा साठा असल्याने शनिवारपासून जिल्ह्याचे लसीकरण बंद करावे लागणार आहे, ...

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला एकच दिवस पुरेल इतका लसींचा साठा असल्याने शनिवारपासून जिल्ह्याचे लसीकरण बंद करावे लागणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी जिल्ह्याचा काेरोनाबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी लसीकरणाबाबतची माहिती पुढे आली. केंद्र शासनाने राज्य शासनाकडे लसीचा साठा दिल्यानंतरच पुन्हा लसीकरण सुरु होणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी आढावा घेण्यात आला त्यावरुन केवळ शुक्रवारपुरते ८३२ डोस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिल्लक होते. त्यामुळे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य विभागाकडून शनिवारपासून लसीकरण थांबवावे लागेल आणि लसीकरणाची मोहीम लस आल्यानंतरच सुरु करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे, असे सामंत म्हणाले.

केंद्र शासनाकडून राज्यांना लस वाटप करण्याचा चार्ट आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांना लस किती दिली आहे. त्यावरुन केंद्र सरकार लसीचा पुरवठा कुठे जाणीवपूर्वक करतेय की कुठे जाणीवपूर्वक करत नाही, हे सिध्द झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे की, महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लस देण्याची क्षमता आहे. ती ६० लाख करण्यापर्यंत नेऊ शकतो. त्यामुळे राज्याला ४० लाख लस उपलब्ध करुन द्या, असे त्यांनी सांगितले असल्याने यावर केंद्र सरकार येत्या दोन दिवसात काय निर्णय घेतेय, हे लवकरच समजेल, असेही ते म्हणाले.

लसीच्या वाया जाण्याबाबत सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे लस वाया जाण्याचे प्रमाण ३ ते ३.५० टक्के आहे, तर महाराष्ट्राचे ३.२७ टक्के आहे. इतर राज्यात ते जास्त आहे. पण दुर्दैवाने सर्वांना महाराष्ट्र दिसते. बाकीची राज्य दिसत नसल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली.