शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पूर्वनाेंदणी करूनही लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण : दीपक पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिल राेजी झालेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आयोजक कोण? पूर्वनोंदणी करून लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण कारणीभूत ...

रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिल राेजी झालेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आयोजक कोण? पूर्वनोंदणी करून लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण कारणीभूत असावे, असा आराेप भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.

रत्नागिरी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेले लसीकरण शासकीय होते? की गैरशासकीय आयोजन होते? शासकीय आयोजन असेल तर शासकीय यंत्रणेने ते जाहीर का केले नाही? लसीकरण विशिष्ट लोकांनाच उपलब्ध व्हावे, असा शासनाचा उद्देश होता का? असे प्रश्‍न अ‍ॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केले आहेत.

या लसीकरणात २०० नागरिकांना लस दिली गेली, पण आज ज्यांनी पूर्वनोंदणी केली होती त्यांना मात्र लस संपल्याने लसीकरण नाही, असे प्रसिद्ध करण्यात आले. नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीचा साठा बघूनच आजची वेळ दिली असणार, मग अचानक लस संपली, असे झाडगावसहित काही केंद्रांना का सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय कोणाच्या खपा मर्जीने झाली, असा प्रश्न अ‍ॅड. पटवर्धन यांनी केला.

ज्याठिकाणी लसीकरण झाले तो हॉल शासनाने ताब्यात घेतला होता का, सॅनिटाईज केला होता का? आयोजन गैरशासकीय असेल तर अन्य संघटना, पक्ष, संस्था यांनी मागणी केल्यास असे लसीकरण कॅम्प देणार का? तसेच पूर्वीच्या दोन शिबिरात दिली गेलेली लस सशुल्क देण्यात आली होती किंवा कसे? आयोजनाचे जाहीर प्रकटन शासनाने कुठे केले होतेे, लसीकरण केंद्राच्या प्रसिद्ध यादीत या मंगल कार्यालयाचा उल्लेख होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

लसीकरण आयोजनासंदर्भात काही निकष आहेत का? ते निकष डावलून आयोजन केले गेले का? या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लसीकरणाचे असे आयोजन मनमानी असून, यंत्रणेकडून लसीचा गैरवापर होत आहे असे वाटावे, अशी स्थिती असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अस पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. तसेच केंद्र शासनाकडेही या संदर्भाने चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत अहवाल पाठवून करण्यात येईल, असे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.