शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वनाेंदणी करूनही लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण : दीपक पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिल राेजी झालेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आयोजक कोण? पूर्वनोंदणी करून लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण कारणीभूत ...

रत्नागिरी : रत्नागिरीत २४ एप्रिल राेजी झालेल्या लसीकरण कार्यक्रमाचा आयोजक कोण? पूर्वनोंदणी करून लस न मिळण्यामागे छुपे लसीकरण कारणीभूत असावे, असा आराेप भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केला आहे.

रत्नागिरी शहरातील एका मंगल कार्यालयात झालेले लसीकरण शासकीय होते? की गैरशासकीय आयोजन होते? शासकीय आयोजन असेल तर शासकीय यंत्रणेने ते जाहीर का केले नाही? लसीकरण विशिष्ट लोकांनाच उपलब्ध व्हावे, असा शासनाचा उद्देश होता का? असे प्रश्‍न अ‍ॅड. पटवर्धन यांनी उपस्थित केले आहेत.

या लसीकरणात २०० नागरिकांना लस दिली गेली, पण आज ज्यांनी पूर्वनोंदणी केली होती त्यांना मात्र लस संपल्याने लसीकरण नाही, असे प्रसिद्ध करण्यात आले. नोंदणी केलेल्या नागरिकांना लसीचा साठा बघूनच आजची वेळ दिली असणार, मग अचानक लस संपली, असे झाडगावसहित काही केंद्रांना का सांगण्यात आले. नागरिकांची गैरसोय कोणाच्या खपा मर्जीने झाली, असा प्रश्न अ‍ॅड. पटवर्धन यांनी केला.

ज्याठिकाणी लसीकरण झाले तो हॉल शासनाने ताब्यात घेतला होता का, सॅनिटाईज केला होता का? आयोजन गैरशासकीय असेल तर अन्य संघटना, पक्ष, संस्था यांनी मागणी केल्यास असे लसीकरण कॅम्प देणार का? तसेच पूर्वीच्या दोन शिबिरात दिली गेलेली लस सशुल्क देण्यात आली होती किंवा कसे? आयोजनाचे जाहीर प्रकटन शासनाने कुठे केले होतेे, लसीकरण केंद्राच्या प्रसिद्ध यादीत या मंगल कार्यालयाचा उल्लेख होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

लसीकरण आयोजनासंदर्भात काही निकष आहेत का? ते निकष डावलून आयोजन केले गेले का? या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लसीकरणाचे असे आयोजन मनमानी असून, यंत्रणेकडून लसीचा गैरवापर होत आहे असे वाटावे, अशी स्थिती असल्याने या प्रकाराची चौकशी करावी, अस पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. तसेच केंद्र शासनाकडेही या संदर्भाने चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत अहवाल पाठवून करण्यात येईल, असे अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.