शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

मतदानासाठी भारतात टाकाऊ प्रणालीचा वापर

By admin | Updated: July 30, 2014 23:58 IST

वामन मेश्राम : निवडणुकीत ‘गडबड’ करून निवडून येण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप

रत्नागिरी : मतदानासाठी भारतात वापरण्यात येत असलेली इलेक्ट्रॉनिक मशिन्स ही जगात टाकाऊ प्रणाली म्हणून ओळखली जाते. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन्स (इव्हीएम) मध्ये गडबड करून काही नेते जिंकून आल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे (बामसेफ) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांनी रत्नागिरीत झालेल्या राष्ट्रव्यापी महा जन- जागरण अभियानप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भारत मुक्ती मोर्चातर्फे राष्ट्रव्यापी महा जन-जागरण अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सद्वारे निवडणूक आयोगाकडून मानव अधिकाराचे उल्लंघन हा या अभियानातील चर्चेचा विषय होता. या अधिवेशनाला बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, संदीप ढवळ, जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष रफीक बिजापुरी, भंडारी समाजाचे अध्यक्ष शरद बोरकर, राष्ट्रीय महिला मूल निवासी संघ, रत्नागिरीच्या अध्यक्ष संगीता शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश जाधव, शरद मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेश्राम पुढे म्हणाले की, प्रगत देशात कुठेच इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स वापरत नसतानाही अशी टाकाऊ प्रणाली ज्या देशात ७० टक्के लोक अशिक्षीत तसेच अर्धशिक्षित आहेत, अशा देशात वापरण्यामागे त्यात गडबड करून निवडून येणे, हेच मोठे षडयंत्र आहे. लोकशाहीने मतदानाचा हक्क दिला तरी निवडून येण्यासाठी १९५२ पासून सातत्याने जनतेची दिशाभूल होत आरोप मेश्राम यांनी केला. यावेळी त्यांनी या सर्व निवडणुकांबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)