शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

मतदानासाठी भारतात टाकाऊ प्रणालीचा वापर

By admin | Updated: July 30, 2014 23:58 IST

वामन मेश्राम : निवडणुकीत ‘गडबड’ करून निवडून येण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप

रत्नागिरी : मतदानासाठी भारतात वापरण्यात येत असलेली इलेक्ट्रॉनिक मशिन्स ही जगात टाकाऊ प्रणाली म्हणून ओळखली जाते. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन्स (इव्हीएम) मध्ये गडबड करून काही नेते जिंकून आल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे (बामसेफ) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांनी रत्नागिरीत झालेल्या राष्ट्रव्यापी महा जन- जागरण अभियानप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भारत मुक्ती मोर्चातर्फे राष्ट्रव्यापी महा जन-जागरण अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सद्वारे निवडणूक आयोगाकडून मानव अधिकाराचे उल्लंघन हा या अभियानातील चर्चेचा विषय होता. या अधिवेशनाला बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, संदीप ढवळ, जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष रफीक बिजापुरी, भंडारी समाजाचे अध्यक्ष शरद बोरकर, राष्ट्रीय महिला मूल निवासी संघ, रत्नागिरीच्या अध्यक्ष संगीता शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश जाधव, शरद मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेश्राम पुढे म्हणाले की, प्रगत देशात कुठेच इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स वापरत नसतानाही अशी टाकाऊ प्रणाली ज्या देशात ७० टक्के लोक अशिक्षीत तसेच अर्धशिक्षित आहेत, अशा देशात वापरण्यामागे त्यात गडबड करून निवडून येणे, हेच मोठे षडयंत्र आहे. लोकशाहीने मतदानाचा हक्क दिला तरी निवडून येण्यासाठी १९५२ पासून सातत्याने जनतेची दिशाभूल होत आरोप मेश्राम यांनी केला. यावेळी त्यांनी या सर्व निवडणुकांबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)